शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावातील कोळपेवाडी, सरकेवस्ती, परीसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या बिबट्याने कोळपेवाडी तसेच आसपासच्या परिसरात अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ला करत ठार मारले होते. त्यामुळे वनविभागाने कोळपेवाडी परीसरात भाऊसाहेब लिंबा कोळपे यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. अखेर मंगळवार (दि. ६) रोजी पहाटे ४ च्या सुमारास अखेर बिबट्या पिंजऱ्यात अडकला.
कोळपेवाडी परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रात्रीच्या वेळेस उसाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना घराच्या बाहेर पडणे अवघड झाले होते. त्यामुळे पशुपालक,शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे माजी सरपंच गणेश कोळपे तसेच भाऊसाहेब कोळपे यांनी शिरुर येथील वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर आणि वनसेवक नवनाथ गांधले यांच्याशी संपर्क साधत या परिसरात पिंजरा लावण्याची विनंती केली होती.
त्यानुसार वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला असल्याने येथील स्थानिक नागरिकांनी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु कोळपेवाडी परिसरात अजूनही २ बिबटया पिंजऱ्याशेजारी पाहिल्यामुळे पुन्हा वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी कोळपेवाडी, सरकेवस्ती तसेच गुनाट ग्रामस्थांनी केली आहे.
हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…
कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…
1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…
मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…
मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…
बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…