शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावातील कोळपेवाडी, सरकेवस्ती, परीसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या बिबट्याने कोळपेवाडी तसेच आसपासच्या परिसरात अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ला करत ठार मारले होते. त्यामुळे वनविभागाने कोळपेवाडी परीसरात भाऊसाहेब लिंबा कोळपे यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. अखेर मंगळवार (दि. ६) रोजी पहाटे ४ च्या सुमारास अखेर बिबट्या पिंजऱ्यात अडकला.
कोळपेवाडी परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रात्रीच्या वेळेस उसाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना घराच्या बाहेर पडणे अवघड झाले होते. त्यामुळे पशुपालक,शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे माजी सरपंच गणेश कोळपे तसेच भाऊसाहेब कोळपे यांनी शिरुर येथील वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर आणि वनसेवक नवनाथ गांधले यांच्याशी संपर्क साधत या परिसरात पिंजरा लावण्याची विनंती केली होती.
त्यानुसार वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला असल्याने येथील स्थानिक नागरिकांनी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु कोळपेवाडी परिसरात अजूनही २ बिबटया पिंजऱ्याशेजारी पाहिल्यामुळे पुन्हा वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी कोळपेवाडी, सरकेवस्ती तसेच गुनाट ग्रामस्थांनी केली आहे.
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…