शिंदोडी (तेजस फडके): शेतीत पिकांचे भरघोस उत्पादन काढताना पुढच्या पिढीला जमीन चांगली द्यायची असेल तर ती आज व भविष्यात जिंवत राहिली पाहिजे यासाठी सुपिकता टिकवून ठेवावी लागेल. त्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करुन जमिनीची सुपीकता राहण्यासाठी जैविक तसेच सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे गरजेचे असल्याचे कृषी सहायक जयवंत भगत यांनी व्यक्त केले.
निर्वी (ता. शिरुर) येथे मृदा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात गावचे माजी उपसरपंच निलेश सोनवणे यांनी खोडवा उसात पाचट ठेवल्याने चांगला फायदा होऊन उत्पादन वाढीसाठी मदत होईल असे मत व्यक्त केले. तर मानसिंग पवार यांनी पाचट व्यवस्थापन मुळे एकरी खोडवा ऊसाचे 85 टन उत्पादन मिळेल असे सांगितले. तसेच जयवंत भगत यांनी माती परीक्षण मृद आरोग्य पत्रिकानुसार खत व्यवस्थापन जमिनीची सुपिकता साठी पाचट व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात मृदाचे पुजन मोहन सोनवणे, निलेश सोनवणे, विजय रोडे, बापु सोनवणे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी रेणुका गायकवाड, कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे, कांतीलाल वीर, कृषी सहायक संतोष फलके, वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष मानसिंग पवार, बापु सोनवणे, विजय रोडे, प्रफुल्ल सोनवणे, बापु विष्णू सोनवणे, शामराव सोनवणे, मारुती भोसले, बाळासाहेब, सोनवणे दत्तात्रय सोनवणे, ज्ञानदेव सोनवणे, नंदकुमार सोनवणे यांसह शेतकरी उपस्थित होते.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…