शिंदोडी (तेजस फडके): शेतीत पिकांचे भरघोस उत्पादन काढताना पुढच्या पिढीला जमीन चांगली द्यायची असेल तर ती आज व भविष्यात जिंवत राहिली पाहिजे यासाठी सुपिकता टिकवून ठेवावी लागेल. त्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करुन जमिनीची सुपीकता राहण्यासाठी जैविक तसेच सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे गरजेचे असल्याचे कृषी सहायक जयवंत भगत यांनी व्यक्त केले.
निर्वी (ता. शिरुर) येथे मृदा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात गावचे माजी उपसरपंच निलेश सोनवणे यांनी खोडवा उसात पाचट ठेवल्याने चांगला फायदा होऊन उत्पादन वाढीसाठी मदत होईल असे मत व्यक्त केले. तर मानसिंग पवार यांनी पाचट व्यवस्थापन मुळे एकरी खोडवा ऊसाचे 85 टन उत्पादन मिळेल असे सांगितले. तसेच जयवंत भगत यांनी माती परीक्षण मृद आरोग्य पत्रिकानुसार खत व्यवस्थापन जमिनीची सुपिकता साठी पाचट व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात मृदाचे पुजन मोहन सोनवणे, निलेश सोनवणे, विजय रोडे, बापु सोनवणे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी रेणुका गायकवाड, कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे, कांतीलाल वीर, कृषी सहायक संतोष फलके, वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष मानसिंग पवार, बापु सोनवणे, विजय रोडे, प्रफुल्ल सोनवणे, बापु विष्णू सोनवणे, शामराव सोनवणे, मारुती भोसले, बाळासाहेब, सोनवणे दत्तात्रय सोनवणे, ज्ञानदेव सोनवणे, नंदकुमार सोनवणे यांसह शेतकरी उपस्थित होते.
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…