शिरूर तालुका

पुढच्या पिढीला कसण्यासाठी जमिनीला जिंवत ठेवा; जयवंत भगत

शिंदोडी (तेजस फडके): शेतीत पिकांचे भरघोस उत्पादन काढताना पुढच्या पिढीला जमीन चांगली द्यायची असेल तर ती आज व भविष्यात जिंवत राहिली पाहिजे यासाठी सुपिकता टिकवून ठेवावी लागेल. त्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करुन जमिनीची सुपीकता राहण्यासाठी जैविक तसेच सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे गरजेचे असल्याचे कृषी सहायक जयवंत भगत यांनी व्यक्त केले.

निर्वी (ता. शिरुर) येथे मृदा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात गावचे माजी उपसरपंच निलेश सोनवणे यांनी खोडवा उसात पाचट ठेवल्याने चांगला फायदा होऊन उत्पादन वाढीसाठी मदत होईल असे मत व्यक्त केले. तर मानसिंग पवार यांनी पाचट व्यवस्थापन मुळे एकरी खोडवा ऊसाचे 85 टन उत्पादन मिळेल असे सांगितले. तसेच जयवंत भगत यांनी माती परीक्षण मृद आरोग्य पत्रिकानुसार खत व्यवस्थापन जमिनीची सुपिकता साठी पाचट व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात मृदाचे पुजन मोहन सोनवणे, निलेश सोनवणे, विजय रोडे, बापु सोनवणे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी रेणुका गायकवाड, कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे, कांतीलाल वीर, कृषी सहायक संतोष फलके, वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष मानसिंग पवार, बापु सोनवणे, विजय रोडे, प्रफुल्ल सोनवणे, बापु विष्णू सोनवणे, शामराव सोनवणे, मारुती भोसले, बाळासाहेब, सोनवणे दत्तात्रय सोनवणे, ज्ञानदेव सोनवणे, नंदकुमार सोनवणे यांसह शेतकरी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

10 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

16 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago