शिरूर तालुका

उरळगाव येथून १ लाख ५१ हजारांचे डाळींब माल अज्ञात चोरट्यांनी केला लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील उरळगाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या शेतात घुसून मोठ्या प्रमाणात डाळींब फळांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिर्याद शेतकरी अमोल बाळासाहेब आफळे (वय 32, व्यवसाय – शेती, रा. आफळे वस्ती, उरळगाव, ता. शिरूर) यांनी दिली आहे.

फिर्यादी यांच्या मालकीच्या गट क्रमांक 510 मधील दोन एकर क्षेत्रातील 252 डाळींब झाडांवरील सुमारे 1512 किलो वजनाचा लाल रंगाचा, गोलसर भगवा जातीचा डाळींब माल, दिनांक 21 जून 2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास ते 22 जून रोजी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्यादीत माहिती दिली आहे. बाजारभावानुसार प्रत्येकी 100 रुपये प्रति किलो दराने या मालाची एकूण किंमत रु. 1,51,200/- इतकी आहे.

या चोरीबाबत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, कृषी क्षेत्रातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या घटनेची नोंद दि. 26 जून रोजी सायंकाळी 7:48 वाजता शिरूर पोलीस ठाण्यात झाली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार भोते करत आहे.. सदर प्रकरणावर शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची कार्यवाही सुरू आहे.

उरळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की, अशा चोरीच्या घटना रोखण्यासाठी रात्रगस्ती वाढवाव्यात, शेत परिसरात सुरक्षेची उपाययोजना करावी, तसेच गुन्हा केलेल्या चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

4 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

4 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

5 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

5 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

5 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

6 तास ago