शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ऐतिहासिक विजय स्तंभाचा विकास करण्यासाठी शंभर एकर जमीन हवी असून त्यांनतर येथे भव्य स्मारक उभे राहील त्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री यांना भेटून मागणी करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
कोरेगाव भीमा येथील २०५ व्या शौर्यदिनी जय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे उपस्थित होते. याप्रसंगी समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त बी. ए. सोळंकी, सहाय्यक आयुक्त संगीता डावखर यांसह आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना केंद्र व राज्य सरकारच्या वतीने आणि समाजाच्या वतीने अभिवादन करायला आलो आहे, येथे विकासासाठी 100 एकर जमीन हवी आहे, येथे स्मारकही उभा राहील पाहिजे, अन त्यासाठी लागणारा निधी समाज कल्याण विभाग सरकार देईल असे सांगत भारतीय जनता पार्टी वारंवार टीका करत आहे यावर मी शांत नाही, मी गप्प बसणारा नाही, मी वेळोवेळी माझी भूमिका मांडलेली आहे, असे सांगत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर बोलणं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी टाळले आहे.
मुंबई: श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘भीमाशंकर हेरिटेज…
मुंबई: भारत महासत्ता होण्याच्या स्वप्नाचे ढोल मोठ्या आवाजात वाजत आहेत. उद्योग, गुंतवणूक, स्टार्टअप, विकास... या…
मुंबई: देशासमोर गंभीर आर्थिक व राजकीय संकट उभे असून त्यातून बाहेर काढण्याची क्षमता मोदी सरकारमध्ये…
जेजुरी: जेजुरी देवस्थानच्या प्रगती व सर्वांगीण विकासासाठी राज्य स्तरावर अनेक बैठका घेण्यात आल्या असून, श्रद्धेला…
शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी (ता.शिरुर) येथे 11 के व्ही ए विद्युत तार अचानक तुटून ऊसाच्या…
पाबळ (सुनील जिते) : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई परिसरातील गारकोलवाडी हे गाव अत्यंत दुष्काळी व…