शिक्रापूर (शेरखान शेख): 1 जानेवारी हा शौर्यदिन जा आजचा आनंदाचा दिवस आहे. आजचा दिवस सामाजिक आणि स्वातंत्र्याचा हा लढा असून या देशाला हजारो वर्ष गुलामी होती आणि राजकीय गुलामी देखील असताना मात्र भिमा कोरेगाव च्या लढाईत ही गुलामी संपली आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या सामाजिक आणि राजकीय इतिहास येथून सुरवात होते. आजचा दिवस सामाजिक व स्वातंत्र्याचा लढा असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एक जानेवारी रोजी होणाऱ्या २०५ व्या शौर्यदिनी जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आले होते यावेळी बोलताना देशभरातून ळखी लोक येथे अभिवादन करण्यासाठी येत असतात तसेच आज आनंदाचा दिवस असल्याचे मी मानतो असे सांगितले.
यावेळी करणी सेनेचे अध्यक्ष अजय सेंगर यांनी केलेल्या वक्तव्या बाबत त्यांना विचारले असता देश गुलाम का झाला तर ते चातूरवर्णीयांनी झाला. चातूरवर्णीयांमध्ये असलेला शत्रिय हा लढाऊ होता. तो हारला की देश हारला लोक हारले समाज हारला अश्या रीतीने झालेलं आहे. त्यामुळे कोणी काय विधान करावं ते त्याने विचारपूर्वक करावं नाहीतर ते विधान त्यांच्याच आंगलट येत, अशी परिस्थीती आहे. तसेच करणी सेना यांच्या मागे कोणीच नाही हे यातून सिद्ध होत असल्याचे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…