शिक्रापूर (शेरखान शेख): 1 जानेवारी हा शौर्यदिन जा आजचा आनंदाचा दिवस आहे. आजचा दिवस सामाजिक आणि स्वातंत्र्याचा हा लढा असून या देशाला हजारो वर्ष गुलामी होती आणि राजकीय गुलामी देखील असताना मात्र भिमा कोरेगाव च्या लढाईत ही गुलामी संपली आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या सामाजिक आणि राजकीय इतिहास येथून सुरवात होते. आजचा दिवस सामाजिक व स्वातंत्र्याचा लढा असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एक जानेवारी रोजी होणाऱ्या २०५ व्या शौर्यदिनी जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आले होते यावेळी बोलताना देशभरातून ळखी लोक येथे अभिवादन करण्यासाठी येत असतात तसेच आज आनंदाचा दिवस असल्याचे मी मानतो असे सांगितले.
यावेळी करणी सेनेचे अध्यक्ष अजय सेंगर यांनी केलेल्या वक्तव्या बाबत त्यांना विचारले असता देश गुलाम का झाला तर ते चातूरवर्णीयांनी झाला. चातूरवर्णीयांमध्ये असलेला शत्रिय हा लढाऊ होता. तो हारला की देश हारला लोक हारले समाज हारला अश्या रीतीने झालेलं आहे. त्यामुळे कोणी काय विधान करावं ते त्याने विचारपूर्वक करावं नाहीतर ते विधान त्यांच्याच आंगलट येत, अशी परिस्थीती आहे. तसेच करणी सेना यांच्या मागे कोणीच नाही हे यातून सिद्ध होत असल्याचे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
1) आपण जेव्हा मॉर्निंग वॉकला जातो तेव्हा आपल्या पायांवर ताण येऊ ते दुखू लागतात. जर…
केसांच्या अनेक समस्यांमध्ये केसगळती व केस अकाली पांढरे होणे या दोन समस्या फारच कॉमन आहेत.…
डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी औषधोपचाराबरोबरच योग्य आहार घेणे देखील तितकेच गरजेचे असते. दिवसभरातील आहारात देखील दिवसाची…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…