शिरूर तालुका

देशाच्या विकासासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा; डॉ. वैशाली आहेर

शिक्रापूर (शेरखान शेख): महिलांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान अनेकांना प्रेरणा देणारे असून महिलांचे सबलीकरण आपल्या देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे देशाच्या विकासासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे मत मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. वैशाली आहेर यांनी व्यक्त केले आहे.

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे उमेद महाराष्ट्र कार्यक्रमाच्या राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत शिरुर पंचायत समिती तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली एकता महिला ग्राम संघ व स्वयंसिद्धी महिला ग्राम संघ वार्षिक सभा व महिला मेळावा प्रसंगी महिलांना मार्गदर्शन करताना मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. वैशाली आहेर बोलत होत्या.

याप्रसंगी यावेळी पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग, सरपंच सविता करपे, उपसरपंच कविता रणसिंग, माजी सरपंच छाया चव्हाण, ज्योती शिर्के, माजी उपसरपंच कविता चौधरी, तनुजा विधाटे, ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब काळे, प्रदीप पवार, डॉ. सचिन चव्हाण, अश्विनी लांडगे, उद्योजक विजयबापू करपे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष एकनाथ लांडगे, दादासाहेब शिंदे, प्रभाग समन्वयक अनिल नरके, सुजाता चव्हाण, कामिनी नागवडे, रोहिणी भागवत, सोनाली थोरात, रूपाली भारती यांसह आदी उपस्थित होते. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

दरम्यान ग्रामसंघ इतिवृत्त वाचन करण्यात आले असून महिला सबलीकरण व ससक्तीकरण या विषयावर मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. वैशाली आहेर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब काळे व उद्योजक विजयबापू करपे यांनी मनोगत व्यक्त करत महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून केलेल्या कामांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामिनी नागवडे यांनी केले तर वर्षा काळे यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

22 तास ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

22 तास ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

23 तास ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

23 तास ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

2 दिवस ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

2 दिवस ago