शिक्रापूर (शेरखान शेख): वीज कायदा २०२१ मधील सुधारणा ग्राहक हिताच्या असून नियमित वीज बिल भरणाऱ्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी महावितरण सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी केले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरुर तालुका व तहसील कार्यालय अन्न नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित ग्राहक प्रबोधन सप्ताहामध्ये मार्गदर्शन करताना विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन बोलत होते.
यावेळी ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत सहसंघटक रमेश टाकळकर, शिरुर तालुका ग्राहक पंचायतचे अध्यक्ष देवेंद्र जगताप, प्रा. संतोष मासळकर, अशोक मोरे, पंडित मासळकर, अशोक दरेकर, अशोक बेंडभर, अक्षय सोंडेकर यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना ज्येष्टांना कार्यालयात हेलपाटे मारायला लागू नयेत म्हणून घरपोच सेवा तक्रार निवारण व बिल भरणा करुन पावती दिली जाते. तसेच वारंवार खंडित वीज पुरवठ्याने हैराण वीज ग्राहकांसाठी नियमित व पुरेशा दाबाने वीजपुरवठा देण्यासाठी महावितरण सदैव तत्पर राहील, असे देखील नितीन महाजन यांनी सांगितले.
विद्यार्थी ग्राहकाची दैनंदिन व्यवहारात होणारी फसवणूक टाळावी, लॅपटॉप, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करताना दिलेल्या हमीप्रमाणे वस्तू नसेल तर ती बदलून देणे बंधनकारक असून सेल्स अँड गुड्स ऍक्ट कलमानुसार दाद मागता येते, असे ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत सहसंघटक रमेश टाकळकर यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा सातारकर यांनी केले तर प्रास्ताविक शिरुर तालुकाध्यक्ष देवेंद्र जगताप केले आणि अशोक मोरे यांनी आभार मानले.
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…