शिरूर तालुका

युवतींनी सायबर गुन्ह्यापासून सावध रहावे; ज्योती आहेरकर

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्याची पिढी मोबाईलच्या आहारी चाललेली असताना मोबाईल मध्ये नवनवीन ॲप युवक वर्ग वापरत असून त्यातून असंख्य सायबर गुन्हे घडत असताना त्यामध्ये अनेक युवती देखील सायबर गुन्ह्याचे बळी ठरत आहेत. मात्र आहेत. मात्र युवतींनी सायबर गुन्ह्यापासून सावध रहावे, असे आवाहन पोलीस नाईक ज्योती आहेरकर यांनी केले आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय येथे पोलीस विभागाच्या निर्भया पथकांतर्गत युवतींना मार्गदर्शन करताना पोलीस नाईक ज्योती आहेरकर बोलत होत्या. यावेळी महिला पोलीस नाईक अपेक्षा टावरे, मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक विलास कुरकुटे, सोमनाथ भंडारे, हरिष शिंदे, मंगल मोकाशी यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना मोबाईलच्या विळख्यात अडकलेले युवक युवती अनेकदा सायबर गुन्ह्यांच्या शिकार बनत असून त्यांची फसवणूक होत आहे. मोबाईल वापरत असताना त्यातील अनावश्यक ॲप्स तसेच जाहिरात यावर मुला मुलींनी लक्ष घालू नये, तर आपले आनंदी जीवण हे जास्त आनंदी कसे होईल यासाठी लक्ष द्यावे तसेच प्रत्येकाने विद्यार्थी जीवनात अभ्यास शिस्त याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

परंतु आजची तरुण पिढी वाईट वर्तनाकडे झुकलेली आहे वेळीच सुधारणे गरजेचे आहे असे देखील पोलीस नाईक ज्योती आहेरकर यांनी सांगितले, तर पोलीस नाईक अपेक्षा टावरे यांनी देखील मुलींच्या अनेक प्रश्नांना योग्य उत्तरे देत मुलींच्या मनातील अनेक शंका समस्या यांचे समाधान केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ भंडारे यांनी केले तर मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण यी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

19 तास ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

19 तास ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

21 तास ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

21 तास ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

2 दिवस ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

2 दिवस ago