इतर

जाणून घ्या पहिला श्रावणी सोमवार पूजा विधी, शिवमूठ आणि महत्त्व

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. चातुर्मासातील श्रावण हा महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात केलेल्या व्रत वैकल्यांचं चांगलं फळ मिळतं. तसेच या महिन्यातील श्रावणी सोमवार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. श्रावणी सोमवारचं व्रत करणाऱ्यांच्या इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार, पार्वतीन या महिन्यात कठोर व्रत करुन भगवान शंकराना प्राप्त केलं होतं. या कारणामुळे हा महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. शनिदेव हे भगवान शंकराचे आवडते शिष्य असल्याने या दिवशी केलेल्या व्रताने शनिदेवही प्रसन्न होतात. त्यासोबत चंद्रदोष, ग्रहणदोष किंवा सर्पदोशातून मुक्ती होते, अशी मान्यता आहे. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार म्हणजेच आज 1 ऑगस्ट रोजी आहे. योगायोगाने या दिवशी विनायकी चतुर्थी देखील आहे.

श्रावणी सोमवार पूजा विधी

सकाळी लवकर उठून स्नान करावे, धूप, दिवा लावून श्री गणेशाची आरती करावी, त्यानंतर मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करावा, पंचामृताने रुद्राभिषेक करुन बेलपत्र अर्पण करावे, शिवमूठ तांदूळ असल्याने शिवलिंगावर अर्पण करावे, शिवलिलामृतातील 11 वा अध्याय वाचावा, शंकराची आरती करुन प्रसाद घ्या, संध्याकाळी पूजा झाल्यानंतर उपवास सोडावा, महादेवाची पूजा करताना चुकूनही शिवलिंगावर तुळस अर्पण करु नका ही काळजी घ्या. तसेच केतकीच्या फुलांचा वापर करु नका यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात, असं धार्मिक मान्यता आहे. तसेच शिवलिंगावर नारळाचे पाणी अर्पण करु नये.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

15 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

22 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago