मुंबई: मुंबईतील जुहू कोळीवाडा येथील समुद्रात सायकांळच्या सुमारास पोहायला गेलेली 5 मुले समुद्रात आलेल्या भरतीच्या लाटेत खोल पाण्यात ओढली जावून बुडून त्यांचा मृत्यु झाला आहे. त्यादिवशी समुद्रात भरती असल्याने मुलाना खोल पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे ते समुद्रात अर्ध्या किमी आतमध्ये ओढले गेल्याने त्या चार मुलाचा दुदैवी मृत्यू झाला आहे.
या घटनेबाबत त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या धर्तीवर शासनाने नागरिकांनी समुद्रात जावू नये असे अर्लट जारी केले असतानाही ही मुले समुद्रकिनाऱ्यावर पोहावयास गेली. या मुलांना महानगरपालिकेच्या जीवरक्षकाने तसेच, समुद्राच्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पालिका कर्मचारी यांनी अनुमती नसताना समुद्रात जाण्यास मज्जाव केला नसल्याचे निदर्शनास आले आहे.
याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी उपरोक्त घटनेबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, चहल यांना उपसभापती कार्यालयातून पत्र पाठविले आहे. पत्रात त्यांनी मुलाना समुद्रात जाण्यास जीवरक्षकाने मज्जाव का केला नाही?, लाटेच्या जवळ जाणाऱ्या मुलाना रोखण्यासाठी कर्मचारी कर्तव्यात का नव्हते? असे प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच, येणाऱ्या पावसाळयामध्ये किनाऱ्यावरती असे प्रकार घडणार नाही याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात व केलेल्या उपाययोजनाचा अहवाल माझ्या कार्यालयास पाठवावा असे पत्रात नमूद केले आहे.
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात जुगार, हातभट्टी दारू, ताडी तसेच अवैध मद्यविक्रीचे धंदे…
शिक्रापूर (ओमकार भोरडे): महावितरणच्या रोहित्र (डीपी) चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी महावितरण व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त…
शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून, एका तीन…
मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक…
तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या…
शिरूर (अरुणकुमार मोटे): "तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले," असा जाब विचारत एका…