Categories: इतर

मुंबईतील सर्व समुद्र किनाऱ्यावर मुलांना जाण्यास रोखण्यासाठी पालिका कर्मचारी नियुक्ती करावेत…

मुंबई: मुंबईतील जुहू कोळीवाडा येथील समुद्रात सायकांळच्या सुमारास पोहायला गेलेली 5 मुले समुद्रात आलेल्या भरतीच्या लाटेत खोल पाण्यात ओढली जावून बुडून त्यांचा मृत्यु झाला आहे. त्यादिवशी समुद्रात भरती असल्याने मुलाना खोल पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे ते समुद्रात अर्ध्या किमी आतमध्ये ओढले गेल्याने त्या चार मुलाचा दुदैवी मृत्यू झाला आहे.

या घटनेबाबत त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या धर्तीवर शासनाने नागरिकांनी समुद्रात जावू नये असे अर्लट जारी केले असतानाही ही मुले समुद्रकिनाऱ्यावर पोहावयास गेली. या मुलांना महानगरपालिकेच्या जीवरक्षकाने तसेच, समुद्राच्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पालिका कर्मचारी यांनी अनुमती नसताना समुद्रात जाण्यास मज्जाव केला नसल्याचे निदर्शनास आले आहे.

याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी उपरोक्त घटनेबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, चहल यांना उपसभापती कार्यालयातून पत्र पाठविले आहे. पत्रात त्यांनी मुलाना समुद्रात जाण्यास जीवरक्षकाने मज्जाव का केला नाही?, लाटेच्या जवळ जाणाऱ्या मुलाना रोखण्यासाठी कर्मचारी कर्तव्यात का नव्हते? असे प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच, येणाऱ्या पावसाळयामध्ये किनाऱ्यावरती असे प्रकार घडणार नाही याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात व केलेल्या उपाययोजनाचा अहवाल माझ्या कार्यालयास पाठवावा असे पत्रात नमूद केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

6 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

6 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

10 तास ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

1 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

1 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

1 दिवस ago