Categories: इतर

पितृपंधरवडा आजपासून सुरु, जाणून घ्या श्राद्ध पद्धत, विधीचे महत्त्व…

पुणे: पितृपक्षाचा महिना सुरु झाला आहे. हिंदू धर्मात पितृ पक्षाला खूप महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की, या दिवसांत आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी पूर्वज यमलोकातून पृथ्वीवरील येतात. त्यामुळे त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृपक्षात तर्पण आणि श्राद्ध केले जाते. हिंदू धर्मानुसार असे मानले जाते की, जर पितरांसाठी श्राद्ध केले तर पितर आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी येते.

जाणून घ्या पितृपक्षाबाबत

यंदा पितृपक्ष 10 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. तर, रविवारी 25 सप्टेंबरला पितृपक्षाची समाप्ती होईल. पितृपक्ष हा 15 दिवसांचा कालावधी आहे. जो हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी सुरू होतो. कृष्ण पक्षातील अमावास्येला त्याची समाप्ती होते. या कालावधीला पितृपक्ष पंधरवडा तसेच श्राद्धपक्ष म्हणतात. या दरम्यान पिंड दान आणि तर्पण हे तारखेनुसार केले जातात. पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या दिवसांत श्राद्ध आणि तर्पण केले जाते. असे मानले जाते की, पितृपक्षातील श्राद्ध विधीने पितरांना मोक्ष मिळतो.

पाच विशेष प्रकारच्या जीवांना भोजन देण्याचा नियम…

शास्त्रानुसार पितृपक्षात श्राद्धासाठी तयार करण्यात आलेल्या 5 विशेष प्रकारच्या जीवांना भोजन देण्याचा नियम आहे. यासाठी सर्व प्रथम ब्राह्मणांसाठी शिजवलेले अन्न 5 भागांमध्ये काढून सर्वांचे वेगवेगळे मंत्र जपत, प्रत्येक भागावर अखंड ठेवून पंचबली अर्पण केली जाते.

पिंडदान आणि तर्पण पद्धत काय आहे?

पितृपक्षात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते.

पिंडदान आणि तर्पण श्राद्ध पक्षाच्या दिवसात कोणत्याही दिवशी करता येते.

श्राद्ध कालावधी या वर्षी 25 सप्टेंबर रोजी संपणार आहे.

श्राद्धाच्या दिवशी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती स्नान करून कुश गवताची अंगठी घालून नवीन वस्त्रे परिधान करतात.

एक लाकडी टेबल पांढऱ्या कापडाने झाकून दक्षिणेकडे तोंड करुन ठेवलेले असते.

ज्यावर पूर्वजांचे छायाचित्र ठेवलेले असते.

या विधीत काळे तीळ आणि जवसच्या बियांचा उपयोग केला जातो.

पिंड पूर्वजांना तांदूळ किंवा गव्हाच्या गोळ्यांच्या रूपात अर्पण केले जातात.

पिंड हे मध, तांदूळ, गहू, बकरीचे दूध, साखर आणि तूप यापासून बनवले जाते.

यानंतर जल, मैदा, जवस, कुश आणि काळे तीळ मिश्रित तर्पण अर्पण केले जाते.

श्राद्ध आणि तर्पण विधी झाल्यानंतर गरीबांना अन्नदान केले जाते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

4 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

11 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

1 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

1 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

1 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

1 दिवस ago