इतर

वैयक्तिक कर्ज घेताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

मुंबई: पैशाची गरज भागवण्यासाठी लोक कर्जाची मदत घेतात. आजारपण, घर खरेदी, शिक्षण, मुलांची लग्नं लग्नासाठी किंवा इतर कारणांसाठी लोकांना कर्ज घ्यावं लागतं. तस वैयक्तिक कर्ज घेणं नक्कीच सोपं आहे, परंतु जर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर ते तुमच्यासाठी अडचणीचं ठरु शकतं.

वैयक्तिक कर्ज म्हणजे नक्की काय…?
वैयक्तिक कर्ज हे खरेतर असुरक्षित कर्ज मानलं जातं. याचा अर्थ सोनेतारण आणि गृहकर्ज याप्रमाणे जमा करण्यासाठी कोणत्याही तारण किंवा सुरक्षा आवश्यक नसते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, कर्जदाराला कोणतीही हमी घेण्याची किंवा काहीही तारण ठेवण्याची गरज नाही. या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी साधारणपणे 12 ते 60 महिन्यांचा असतो. हे कर्ज वैद्यकीय आणीबाणी, लग्न किंवा शिक्षण खर्च यासारख्या कोणत्याही प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरलं जाऊ शकते.

व्याज दरावर द्या लक्ष
वैयक्तिक कर्ज घेताना व्याजदराची व्यवस्थित माहिती करुन घ्या. कारण वैयक्तिक कर्जाचे व्याजदर इतर कोणत्याही प्रकारच्या कर्जापेक्षा जास्त असतात. ते 10 ते 24 टक्क्यांपर्यंत असू शकतात. व्याजदर जितका जास्त असेल तितका तुमचा EMI जास्त असेल. अशा स्थितीत सर्वप्रथम लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे जिथे सर्वात कमी व्याजदर असेल तिथून पर्सनल लोन घ्या.

वेळेवर पैसे भरा
वैयक्तिक कर्ज कोणत्याही कारणासाठी घेतलं असलं तरी त्याचा हप्ता विलंब न लावता वेळेवर जमा होईल याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण हप्ते वेळेत जमा न झाल्यास किंवा थकल्यास त्यामुळं भविष्यात कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना तुम्हाला अडचण येऊ शकते. वास्तविक, याचं कारण म्हणजे वेळेवर पेमेंट न केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. खराब क्रेडिट स्कोअरमुळे भविष्यात कर्ज मिळणं कठीण होतं, कारण बहुतेक कर्जदाते याच आधारावर कर्ज मंजूर करतात.

परतफेड करता येईल तेवढंच कर्ज घ्या
कोणत्याही कर्जाचं जाळं सहसा खूप वाईट असतं. कधीकधी अशी परिस्थिती उद्भवते की, आपण ईएमआय भरण्यास असमर्थ ठरतो. अशा परिस्थितीत तुम्ही घेतलेलं कर्ज डोकेदुखी ठरतं. म्हणूनच सहज उपलब्ध होणारं पर्सनल लोन घेताना हे लक्षात ठेवावं की तुम्हाला आवश्यक तेवढंच कर्ज घ्या. म्हणजेच जेवढी रक्कम सहज भरता येईल तेवढेच कर्ज घ्या.

कर्ज किती वर्षांसाठी घ्यायचं…?
वैयक्तिक कर्ज घेताना, तुम्हाला कोणत्या कालावधीसाठी कर्ज घ्यायचं आहे हे देखील लक्षात ठेवा. दीर्घ कालावधीसाठी कर्ज घेतल्याचा अर्थ असा आहे की तुमचा EMI कमी असेल. परंतु तुम्हाला ते दीर्घ काळासाठी भरावं लागेल आणि अधिक व्याज देखील द्यावं लागेल. दुसरीकडे, जर तुम्ही परतफेडीचा कालावधी कमी ठेवला, तर ईएमआय नक्कीच जास्त असेल, परंतु व्याज कमी भरावं लागेल. अशा परिस्थितीत, तुमच्या गरजेनुसार, वैयक्तिक कर्जाचा कालावधी निवडा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…

10 तास ago

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

18 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

18 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

18 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

18 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

18 तास ago