Categories: इतर

…त्यामुळे या सरकारला वठणीवर आणायलाच हवे

हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचा कार्यकर्ता मेळावा पार…

वर्धा हिंगणघाट: महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत केली जात होती. कर्जमाफी करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला जात होता. मात्र हे सरकार आमदार सांभाळण्यात व्यस्त आहे. या सरकारचा महाराष्ट्र हा ४० आमदारांपूरताच मर्यादित आहे. त्यामुळे या सरकारला वठणीवर आणायला हवे, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हिंगणघाट येथील कार्यकर्ता मेळाव्यात दिला.

मागच्या आठवड्यातच पावसाळी अधिवेशन मुंबईत पार पडले अतिवृष्टीने बेजार झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी. या भागात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारला धारेवर धरले. सरकारने घाबरुन घोषणा तर केली. परंतु अजून एक दमडीही या शेतकऱ्यांना दिली गेली नाही, असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी सरकारवर केला.

हिंगणघाटच्या तरुणाईचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रचंड विश्वास आहे, याची अनुभुती आज तरुणांची गर्दी पाहून आली. हा तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मोठ्या आशेने पहात आहे. आपण त्यांच्या विश्वासाला तडा न जावू देता त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे, सर्व गटतट विसरुन आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. आपण एकत्र आलो तर ही जागा राष्ट्रवादी हमखास जिंकणार असा विश्वास जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

सरकारशी संघर्ष करायचा असेल तर कार्यकर्त्यांची मोठी फौज आपल्याला लागेल. त्यासाठी सभासद नोंदणी तात्काळ पूर्ण करा. सर्वांनी एकत्र येऊन सभासद नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी. आज महाराष्ट्राला सर्वात जास्त विश्वास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे. आपल्याकडे पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याचे विचार आहे. या विचारांच्या जोरावरच आपण हा पक्ष बांधायचा आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने, तरुणांच्या ताकदीने हा गड आपण पुन्हा राष्ट्रवादीमय करु, असा आशावादही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

या कार्यकर्ता मेळाव्याला माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी आमदार राजुभाऊ तिमांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर गमे, प्रवीण कुंटे पाटील, अतुल वांदिले, महिला जिल्हाध्यक्षा ज्योतीताई देशमुख, महिला शहराध्यक्षा मृणालताई टिळे, तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात महसूलचे अधिकारी कर्मचारी आरक्षण सोडतीत व्यस्त; अन मुरुम माफिया नैसर्गिक संपत्तीच्या लुटीत मस्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया…

7 तास ago

रांजणगाव MIDC मधील औषध कंपनीला २५ लाखांच्या खंडणीची मागणी; वकिलाविरोधात गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी…

7 तास ago

कुर्ला विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…

12 तास ago

राष्ट्रवादीतील संघर्षाचा फुगा आणि घराणेशाहीची वास्तवकथा

मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…

12 तास ago

विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची ‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ सुरू

मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…

12 तास ago

पुणे विषारी दारू प्रकरणाच्या तपासाला वेग; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनांनुसार सीआयडीची व्यापक कारवाई

पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…

12 तास ago