शिंदोडी (तेजस फडके): गुनाट (ता. शिरुर) येथील चिंचणी-गुनाट रोडवर असणाऱ्या गुणवंतवाडी येथील सोमनाथ दत्तात्रेय गिरमकर या शेतकऱ्याच्या दोन मेंढ्यावर रविवार (दि १७) रोजी पहाटे २:३० च्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने त्या मृत्यूमुखी पडल्या असुन या शेतकऱ्याचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे.
चासकमानचा कॅनॉल गुनाट येथुन जात असल्याने गावात जवळपास ८० टक्के उसाचे क्षेत्र झाले असुन या उसात कायम “बिबट्या” चे नागरिकांना दर्शन होत असते. अनेक ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे शेतकऱ्यांना आढळतात परंतु वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत संपर्क साधल्यास ते कधीच वेळेवर येत नाहीत. त्यामुळे बिबटया शेळ्या, मेंढ्या यांच्यावर हल्ले वाढत असताना वनविभागाकडुन दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची टाळाटाळ…?
शिरुरच्या पुर्व भागात नेमणुकीस असलेले वनविभागाचे कर्मचारी कधीच वेळेवर फोन उचलत नाहीत. तसेच गरजेच्या वेळेला त्यांचे फोन कायमच बंद असतात. एखाद्या ठिकाणी बिबटयाचे ठसे आढळल्यास त्या जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी न करता ते शेतकऱ्यांनाच फोटो काढुन पाठवायला सांगतात त्यामुळे हे कर्मचारी नक्की पगार कशाचा घेतात असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…
अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…