शिंदोडी (तेजस फडके): गुनाट (ता. शिरुर) येथील चिंचणी-गुनाट रोडवर असणाऱ्या गुणवंतवाडी येथील सोमनाथ दत्तात्रेय गिरमकर या शेतकऱ्याच्या दोन मेंढ्यावर रविवार (दि १७) रोजी पहाटे २:३० च्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने त्या मृत्यूमुखी पडल्या असुन या शेतकऱ्याचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे.
चासकमानचा कॅनॉल गुनाट येथुन जात असल्याने गावात जवळपास ८० टक्के उसाचे क्षेत्र झाले असुन या उसात कायम “बिबट्या” चे नागरिकांना दर्शन होत असते. अनेक ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे शेतकऱ्यांना आढळतात परंतु वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत संपर्क साधल्यास ते कधीच वेळेवर येत नाहीत. त्यामुळे बिबटया शेळ्या, मेंढ्या यांच्यावर हल्ले वाढत असताना वनविभागाकडुन दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची टाळाटाळ…?
शिरुरच्या पुर्व भागात नेमणुकीस असलेले वनविभागाचे कर्मचारी कधीच वेळेवर फोन उचलत नाहीत. तसेच गरजेच्या वेळेला त्यांचे फोन कायमच बंद असतात. एखाद्या ठिकाणी बिबटयाचे ठसे आढळल्यास त्या जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी न करता ते शेतकऱ्यांनाच फोटो काढुन पाठवायला सांगतात त्यामुळे हे कर्मचारी नक्की पगार कशाचा घेतात असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…
महेश तपासे यांचा सवाल; परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि महिला आरक्षणावरही केंद्रावर टीका मुंबई: पाहलगाम…
मुंबई : KEM Hospital (के.ई.एम. रुग्णालय) चे नाव बदलण्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद…
मुंबई: महिला आरक्षण विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस खासदार…
मुंबई: काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत…
मुंबई: पीसीएम आणि पीसीबी गटातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेत दुसऱ्या प्रयत्नासाठी (Second Attempt) नोंदणी…