शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे शोध पथकात कार्यरत असलेले पोलिस नाईक विकास पाटील व पोलीस शिपाई निखिल रावडे यांना नुकताच पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते बहिर्जी नाईक हा पुरस्कार प्रदान करत त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
शिक्रापूर ता. शिरूर पोलीस स्टेशन मधील गुन्हे शोध पथकात कार्यरत असलेले पोलिस नाईक विकास पाटील व पोलीस शिपाई निखिल रावडे हे परिसरातील सर्व हालचाली व गुन्हेगारांवर लक्ष ठेवून असतात. त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल केली, तर शिक्रापूर परिसरात दुचाकी चोऱ्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असताना दोघांनी या गंभीर गुन्ह्यांतील आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले असता त्याच्याकडून चोरीच्या तब्बल ४५ दुचाक्या हस्तगत करण्यात आलेल्या होत्या तर तब्बल ५० गुन्हे उघड झाले होते. पोलिस नाईक विकास पाटील व पोलीस शिपाई निखिल रावडे यांच्या या कार्याची दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते पोलिस नाईक विकास पाटील व पोलीस शिपाई निखिल रावडे यांना बहिर्जी नाईक हा पुरस्कार देत गौरव करण्यात आला आहे.
या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. मिलिंद मोहिते, मितेश घट्टे यांसह आदी उपस्थित होते, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी पुणे ग्रामीण पोलिस दलाची धुरा हाती घेताच पोलिस दलात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्रक व पुरस्कार देउन कामातील आलेख वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचा नवा पायंडा पाडला असून त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंबई : मुंबईच्या स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण आणि पर्यावरण संरक्षणासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा निधी…
काँग्रेसच्या टीकेवर दमानियांचा आक्षेप; "अशी भाषा कोणत्याही पक्षाला शोभणारी नाही" मुंबई : बीडमधील पत्रकार परिषदेदरम्यान…
गाभाऱ्यातील फोटोंवरून सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया; मंदिर प्रशासनाकडून स्पष्टीकरणाची मागणी मुंबई: अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने…
आदमापूर (कोल्हापूर): कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानातील तब्बल 60 कोटी 75 लाख…
‘राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं’ वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांचे मोठे आवाहन; राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण मुंबई :…
रक्ताच्या कॅन्सरला ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेमिया असेही म्हणतात. रक्ताचा कर्करोग कोणत्याही वयाच्या व्यक्तीस होऊ शकतो…