क्राईम

शिक्रापुरात बेकायदेशीर सावकारी प्रकरणी एकावर गुन्हा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे व्यवसायिकांना व्याजाने पैसे देऊन वेळेवर पैसे परत न केल्याने व्यवसायिकांना शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अजहर सय्यद या सावकारावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील हॉटेल व्यवसायिक राजेंद्र करंजे यांच्या साक्षी हॉटेलमध्ये अजहर सय्यद हा इसम आला होता त्याने मी व्याजाने पैसे देतो आणि पन्नास दिवसाच्या मुदतीत दररोज काही रक्कम ठरवून परत घेतो असे सांगत पैशाची आवश्यकता आहे का असे सांगितले.

दरम्यान करंजे यांना पैशाची गरज असल्यामुळे त्यांनी काही पैसे घेतले आणि त्याची परतफेड देखील सय्यद यांना दररोज वेळोवेळी केली. त्यानंतर पुन्हा करंजे यांनी काही पैसे घेतले मात्र व्यवसाय मंदीत असल्याने काही पैसे दिल्यानंतर पुढील पैसे वेळत देऊ न शकल्याने अजहर सय्यद याने करंजे यांच्या हॉटेल मध्ये येत पैशाची मागणी केली असता सध्या धंदा कमी आहे लवकरच पैसे देतो असे करंजे यांनी म्हटले असता सय्यद याने करंजे यांना शिवीगाळ, दमदाटी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत राजेंद्र भालचंद्र करंजे (वय ५०) रा. पाबळ चौक शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अजहर सय्यद रा. नाना पेठ पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

5 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

5 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

6 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

6 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

6 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

7 तास ago