क्राईम

रुद्राक्ष महोत्सवात चेंगराचेंगरी महाराष्ट्रातील एक महिला ठार तर चार बेपता….

सिहोर: मध्यप्रदेशातील सिहोर येथील कुबेरश्वर धाम नावाने परिचीत असलेल्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर विठ्ठलेश सेवा समितीने आयोजीत केलेल्या रुद्राक्ष महोत्सव व शिवपुराण कथा वाचन कार्यक्रमात रुद्राक्ष मिळविण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत महाराष्ट्रातील एक महिला जागीच ठार झाली, तर चार महिला अजून बेपता आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सिहोर मधील रुद्राक्ष महोत्सव कार्यक्रमासाठी देशभरातून मोठया संख्येने भाविक रात्रीपासूनच सिहोर मध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली होती, तर येथे कुठल्याही प्रकारचे नियोजन नव्हते साधे पिण्यासाठी पाणी देखील उपलब्ध नव्हते त्यामुळे असंख्य भाविक हे रात्रीपासून अन्न पाण्यावाचून उपाशी होते. रुद्राक्ष वाटप कार्यक्रम सुरु होताच भाविकांची झुंबड उडाली व त्यात हि दुर्घटना घडली.

सिहोर इथे मोफत रुद्राक्ष घेण्यासाठी देशभरातून हजारो भाविक इथे पोहोचले आहेत. सिहोरला जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास 30 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच आहेत. तर रेल्वे स्थानकातही प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे.

आठ दिवसात 15 लाख भाविक येथील अशी अपेक्षा असताना पहिल्याच दिवशी पाच लाख भाविक पोहचले आणि गोंधळ उडाला. महामार्ग ठप्प झाले. भाविकांचे हाल होऊ लागले. प्रशासन आणि आयोजकांनी केलेले सर्व नियोजन कोलमडले. नाईलाजाने कथा मध्येच सोडून रुद्राक्ष वाटप स्थगित करीत असल्याचे पंडित प्रदीप मिश्रा यांनी जाहीर केले होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

8 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

8 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

8 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

9 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

9 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

9 तास ago