हवेली: कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील प्रयागधाम (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला काळीमा फासणारा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मतदान सुरू असतानाच बोगस ओळखीच्या आधारे मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा संशयित मतदारांपैकी तिघांना भरारी पथकाने रंगेहाथ पकडले असून, उर्वरित तिघे घटनास्थळावरून पसार झाले आहेत. या प्रकरणाची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समोर आणली.
स्थानिक नागरिक आणि सजग मतदारांनी काही व्यक्तींविषयी संशय व्यक्त केल्यानंतर ही बाब तत्काळ निवडणूक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आली. त्यानंतर भरारी पथकाने तातडीने कारवाई करत बोगस ओळखीवर मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतले. या संशयितांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.
चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तींकडील ओळखपत्रे संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, गोंधळाचा फायदा घेत इतर तीन संशयित मतदार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरले.या प्रकारामुळे मतदान प्रक्रियेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निवडणूक यंत्रणेच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे, तर पकडण्यात आलेल्या बोगस मतदारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान, या मतदान केंद्राच्या केंद्र प्रमुखांनी रीतसर तक्रार दाखल केली असून, त्यानुसार संबंधित बोगस मतदारांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली.लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेला गालबोट लावणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…