हवेली: कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील प्रयागधाम (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला काळीमा फासणारा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मतदान सुरू असतानाच बोगस ओळखीच्या आधारे मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा संशयित मतदारांपैकी तिघांना भरारी पथकाने रंगेहाथ पकडले असून, उर्वरित तिघे घटनास्थळावरून पसार झाले आहेत. या प्रकरणाची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समोर आणली.
स्थानिक नागरिक आणि सजग मतदारांनी काही व्यक्तींविषयी संशय व्यक्त केल्यानंतर ही बाब तत्काळ निवडणूक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आली. त्यानंतर भरारी पथकाने तातडीने कारवाई करत बोगस ओळखीवर मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतले. या संशयितांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.
चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तींकडील ओळखपत्रे संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, गोंधळाचा फायदा घेत इतर तीन संशयित मतदार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरले.या प्रकारामुळे मतदान प्रक्रियेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निवडणूक यंत्रणेच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे, तर पकडण्यात आलेल्या बोगस मतदारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान, या मतदान केंद्राच्या केंद्र प्रमुखांनी रीतसर तक्रार दाखल केली असून, त्यानुसार संबंधित बोगस मतदारांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली.लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेला गालबोट लावणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…
संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…
शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…
नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…
सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…