क्राईम

लग्नाला विरोध केला म्हणून उचलल टोकाच पाऊल, प्रेयसीचा मृत्यू तर प्रियकर…

नागपूर: प्रेमविवाहाला आजही अनेक ठिकाणी विरोध पाहायला मिळतो. यामुळे अनेकदा प्रेमीयुगुल टोकाचं पाऊल उचलतात. अशीच एक धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यात घडली. लग्नाला घरच्यांचा विरोध होता म्हणून प्रेमीयुगुलाने आत्महत्या करुन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. यात प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. तर प्रियकर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

अरुण सुखदास कोडवते (वय 22) रा. रयतवाडी- वडांबा असे यातील प्रियकराचे नाव आहे. तर अश्विनी रामेश्वर उईके (वय 22), रा. फुलझरी- जंगली असे त्याच्या प्रेयसीचे म्हणजे मृत तरुणीचे नाव आहे. ही घटना रामटेक तालुक्यातील रयतवाडी येथे घडली.

चार वर्षांपासून हे दोन्ही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अरुण कोडवते हा शेतकरी आहे. अश्विनी ही शेजारच्या गावातील तरुणी असून एका लग्नात त्यांची भेट झाली. यानंतर त्यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अश्विनीच्या मोठ्या बहिणीचे लग्न व्हायचे असल्याने ते दोघेही दोन वर्षे लग्नासाठी थांबले.

दरम्यान, प्रेमसंबंधाची कुणकुण तरुणीच्या भावाला लागली. त्यामुळे कुटुंबीय चिडले होते. तर इकडे अरुणच्याही घरी माहिती झाले. त्यालाही घरातून विरोध होता. त्यामुळे गेल्या 8 दिवसांपूर्वी दोघेही एका ठिकाणी भेटले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी अश्विनीने घरातून पळ काढत थेट अरुणचे घर गाठले. तर अचानक अश्विनीला घरी आल्याचे पाहिल्यावह अरुणही हादरला.

मात्र, त्याने आईवडील आणि भावंडाची समजूत घातली आणि लग्न लावून देण्यासाठी परिवाराला तयार केले. यानंतर दुसऱ्या दिवशी अश्विनीचे 2 भाऊ अरुणच्या घरी आले. यावेळी त्यांनी अश्विनीला सोबत घरी येण्यासाठी दबाव टाकला असता तिने परत येण्यास नकार दिला. त्यामुळे दोघेही भाऊ घरी परतले. यानंतर दुसऱ्या दिवशी अश्विनी आणि अरुण यांनी कीटकनाशक घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर शेजाऱ्यांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. यात अश्विनीचा मृत्यू झाला आहे तर अरुण नागपूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तरुणीच्या मृत्यूप्रकरणी देवलापार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

2 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

2 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

2 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

4 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

16 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

16 तास ago