क्राईम

पोलिस महिलेस ब्लॅकमेल, माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा…

बीड: माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा मी फाशी घेईन, अशी धमकी देत महिला अंमलदारास अश्लील मेसेज पाठवून ब्लॅकमेल करणाऱ्या अंमलदारास पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी १३ सप्टेंबरला निलंबनाचा दणका दिला. माजलगाव येथे १० सप्टेंबरला ही घटना घडली होती. हरिश्चंद्र खताळ, असे निलंबित अंमलदाराचे नाव आहे.

हरिश्चंद्र खताळ व पीडित महिला अंमलदार ग्रामीण ठाण्यात कार्यरत आहेत. २०२१ पासून ते २७ ऑगस्ट २०२२ पर्यंत हरिश्चंद्र खताळ याने व्हॉटसअॅप मेसेज करून या महिलेस त्रास दिला. ८ सप्टेंबरला रात्री घरी येऊन माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा मी फाशी घेईन, असे म्हणत धमकावून विनयभंग केला होता. त्यानंतर त्याची पोलीस पत्नी शिवकन्या निंगुळे हिने पैसे घेऊन प्रकरण मिटवून टाक नाही तर तुझ्यावर, तुझ्या नातेवाईकांवर ३०६ नुसार गुन्हा दाखल करून तुझी बदनामी करीन, तुला कुठे तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, अशी धमकी दिली होती.

पीडित महिला अंमलदाराच्या फिर्यादीवरून पो.कॉ. हरिश्चंद्र खताळ व पो.ना. शिवकन्या निंगुळे या दाम्पत्यावर शहर ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली होती. गैरवर्तन केल्याचा ठपका ठेऊन पो.कॉ. हरिश्चंद्र खताळवर निलंबनाची कारवाई केली. १३ रोजी याबाबतचे आदेश काढल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन गावठी पिस्तुलांसह पंधरा जिवंत काडतुसे जप्त

यवत (प्रतिनिधी) अवैध अग्निशस्त्रांचा वापर करून गुन्हे करण्याच्या शक्यतेला आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून विशेष…

3 तास ago

रांजणगाव गणपतीत ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई; कोंढापुरी तलावात चासकमानचे पाणी सोडा; शेखर पाचुंदकर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात ऐन पावसाळ्याच्या दिवसांतच पाणीटंचाई निर्माण झाल्याने…

3 तास ago

मधमाशी चावली तर चटकन करा हे ३ उपाय

मधमाशीने डंक मारल्यावर विष त्वचेमध्ये प्रवेश करतं आणि त्यामुळे सूज, लालसरपणा, जळजळ आणि दुखणे सुरू…

6 तास ago

सतत थकवा, अंगदुखी या आजारांची प्रमुख लक्षण कोणती

हा थकवा देखील साध्या किरकोळ प्रमाणापासून ते अगदी बर्न आऊट सिंड्रोमपर्यंत असू शकतो. म्हणजे इतक्या…

6 तास ago

पावसाळ्यात वाढते मलेरिया- डेंगूची साथ, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी ५ उपाय करा

पावसाळा सुरु झाला की वातावरणात गारवा पसरतो. परंतु या ऋतूमध्ये अनेक आजार देखील उद्भवतात. दूषित…

6 तास ago

संवादाची संस्कृती जपूया; महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचे भान ठेवूया

मुंबई: महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक, विचारवंत आणि लोकशाही मूल्यांची भूमी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी…

6 तास ago