औरंगाबाद: बुधवारी औरंगाबाद प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची झालेल्या बैठकित जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की, मार्च २०२० मध्ये खटुआ समितीच्या शिफारशीनुसार शासनाकडे प्रस्ताव दिला होता. यानुसार रिक्षाला पहिल्या टप्प्यात दीड किलोमीटरला २६ रुपये तर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरला १८ रुपये अशी सुधारणा करण्यात आली. पेट्रोलचे दर ७८ रुपये असताना व आजच्या पेट्रोलच्या दराची तुलना करता ४५ टक्के दरवाढ होणे अपेक्षित होते. मात्र नागरिकांचा विचार करता २३ टक्के दरवाढ झाली आहे. आता शहरातील ९६ मार्ग निश्चित केले असून या ठिकाणी शेअरिंग रिक्षा थांब्याचे बोर्ड सीएसआर फंडातून लावण्यात येणार आहेत.
मागील आठ दिवसांपासून रिक्षाचालक संघटनेकडून रिक्षा भाडेवाढ करण्याची मागणी सुरू हाेती. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ही मागणी मान्य करत रिक्षाचे भाडे दीड किलोमीटरला २६ रुपये तर पुढे प्रत्येक किलोमीटरसाठी १८ रुपयांची वाढ करण्यास मंजुरी दिली. शेअरिंग रिक्षासाठी प्रत्येकी तीन प्रवाशांसाठी ३० टक्के दरवाढ लागू असेल. याआधी २०१५ मध्ये किमी अंतरासाठी १४ रुपये तर पुढील प्रत्येक किमीसाठी १४ रुपये दरवाढ झाली हाेती.
२ ऑक्टोबरपासून ६० दिवसांच्या आत रिक्षाचालकांना नवे कॅलिब्रेटर मीटर बसवावे लागतील. त्यासाठी ९ ठिकाणी सेंटर उघडले जाणार असून तोपर्यंत त्यांना ट्रॅफिक कार्ड दिले जातील. यासोबतच रिक्षाचालकांना गणवेश घालणे अनिवार्य असेल. पार्किंग नसलेल्या ठिकाणी रिक्षा पार्क करता येणार नाही. प्रवासी भाडे नाकारता येणार नाही.
मुंबई: मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात प्रदीर्घ आणि समर्पित कार्य करणाऱ्या ज्येष्ठ भाषातज्ज्ञ व…
कल्याण-डोंबिवली : मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी…
बार्शी : भोंदू मनोहर भोसले याच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याच्या आरोपातून अटक करण्यात आलेल्या दत्त कला…
अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागाला सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास…
कोल्हापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यशैलीचे आणि…
उत्पादन घट, आयात आणि साठेबाजीच्या आरोपांनी सरकारसमोर प्रश्न मुंबई : देशातील साखरेच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांच्या…