औरंगाबाद: बुधवारी औरंगाबाद प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची झालेल्या बैठकित जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की, मार्च २०२० मध्ये खटुआ समितीच्या शिफारशीनुसार शासनाकडे प्रस्ताव दिला होता. यानुसार रिक्षाला पहिल्या टप्प्यात दीड किलोमीटरला २६ रुपये तर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरला १८ रुपये अशी सुधारणा करण्यात आली. पेट्रोलचे दर ७८ रुपये असताना व आजच्या पेट्रोलच्या दराची तुलना करता ४५ टक्के दरवाढ होणे अपेक्षित होते. मात्र नागरिकांचा विचार करता २३ टक्के दरवाढ झाली आहे. आता शहरातील ९६ मार्ग निश्चित केले असून या ठिकाणी शेअरिंग रिक्षा थांब्याचे बोर्ड सीएसआर फंडातून लावण्यात येणार आहेत.
मागील आठ दिवसांपासून रिक्षाचालक संघटनेकडून रिक्षा भाडेवाढ करण्याची मागणी सुरू हाेती. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ही मागणी मान्य करत रिक्षाचे भाडे दीड किलोमीटरला २६ रुपये तर पुढे प्रत्येक किलोमीटरसाठी १८ रुपयांची वाढ करण्यास मंजुरी दिली. शेअरिंग रिक्षासाठी प्रत्येकी तीन प्रवाशांसाठी ३० टक्के दरवाढ लागू असेल. याआधी २०१५ मध्ये किमी अंतरासाठी १४ रुपये तर पुढील प्रत्येक किमीसाठी १४ रुपये दरवाढ झाली हाेती.
२ ऑक्टोबरपासून ६० दिवसांच्या आत रिक्षाचालकांना नवे कॅलिब्रेटर मीटर बसवावे लागतील. त्यासाठी ९ ठिकाणी सेंटर उघडले जाणार असून तोपर्यंत त्यांना ट्रॅफिक कार्ड दिले जातील. यासोबतच रिक्षाचालकांना गणवेश घालणे अनिवार्य असेल. पार्किंग नसलेल्या ठिकाणी रिक्षा पार्क करता येणार नाही. प्रवासी भाडे नाकारता येणार नाही.
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…
ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…
मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…