क्राईम

शिरूर तालुक्यात सामाईक मोटारीच्या वादातून भावाचा भावावर हल्ला; दगडाने डोक्यात मारहाण

शिरूर  (ओमकार भोरडे): सामाईक इलेक्ट्रिक मोटार वापरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने व भावजयाने लहान भावाला बेदम मारहाण केल्याची घटना शिरूर तालुक्यातील गुनाट येथे घडली.

याबाबत गुनाट येथील शेतकरी संदीप कारभारी कोळपे (वय ३८) यांनी शिरूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, शनिवारी (दि. ७) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास संदीप कोळपे हे घरी असताना त्यांचे मोठे भाऊ भाऊसाहेब कारभारी कोळपे व भावजय सोनाली भाऊसाहेब कोळपे हे त्यांच्या घरासमोर आले.

सामाईक असलेली इलेक्ट्रिक मोटार घरी का आणली, असा जाब विचारत दोघांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावर संदीप यांनी मोटार आता कोणीही वापरणार नसल्याचे सांगितल्याने आरोपी संतापले. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ व दमदाटी करत संदीप यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील दगडाने त्यांच्या डोक्यात मारून जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात संदीप कोळपे यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार टेंगले करीत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…

4 तास ago

महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी

मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…

5 तास ago

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…

5 तास ago

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

21 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

22 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

22 तास ago