क्राईम

15 व्यावसायिकांवर गुन्हे दाखल; जाणून घ्या कारण…

औरंगाबाद: सुरक्षतेच्या दृष्टीने महामार्गावरील दोन लेनमध्ये दुभाजक करण्यात येतात. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना आपापल्या लेनवरून प्रवास करतांना दुसऱ्या बाजूच्या येणाऱ्या वाहनांचा धोका किंवा अपघात होऊ नयेत म्हणून मध्यभागी दुभाजक तयार करण्यात येतात. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातल्या काही व्यावसायिकांनी महामार्गावरील आपल्या दुकानात ग्राहकांनी सहजपणे यावे यासाठी चक्क महामार्गावरील लेनच्यामध्ये असलेले दुभाजक तोडून वळण रस्ता तयार केल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी अशा 15 व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले आहे. ज्यामध्ये पाच वर्षापर्यंत कारावासासह आर्थिक दंडाची शिक्षा प्रस्तावित आहे.

या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल…

कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे:

हॉटेल मावली, हॉटेल शिवराज, हॉटेल अशोक, हॉटेल आबाचा वाडा, हॉटेल श्रीमुर्ती, गर्जे फार्म हाऊस, हादगाव वॉशिंग सेंटर सर्व कन्नड हायवे वरिल आहेत.

खुलताबाद पोलीस ठाणे:

हॉटेल आम्रपाली, हॉटेल रोहीणी सर्व कसबाखेडा ते पळसवाडी या महामार्गावरीलआहेत.

गंगापुर पोलीस ठाणे:

हॉटेल बटर फलाय (जुने कायगाव), हॉटेल लोकसेवक, गांधी पेट्रोल पंप, हॉटेल जिजावु, गॅनोज कंपनी, एच.पी. पेट्रोलपंप, हॉटेल इंडियन ढाबा, ग्रामपंचायत ढोरेगाव

पाचोड पोलीस ठाणे:

आडुळ बायपास जवळ माऊली लॉन्स समोर रजापुर, डाभरुळ गावा जवळ अज्ञात व्यक्तीविरोध्दात.

करमाड पोलीस ठाणे:

औरंगाबाद ते जालना रोडवर करमाड गावाजवळील रोडवरील दुभाजक अज्ञात व्यक्ती विरूध्द. महामार्ग व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या माध्यमांतून हे गुन्हे दाखल करण्यात आले असून, ही कारवाई पुढे अशीच सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

3 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

3 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

3 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

3 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

3 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

5 तास ago