संभाजीनगर: लाडगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आदर्श पतसंस्थेतील 22 लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने 38 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रामेश्वर नारायण इथर असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे.
रामेश्वर यांनी मुलीच्या शिक्षणाची आणि लग्नाची तजवीज म्हणून ही रक्कम आदर्श पतसंस्थेत जमा केली होती. रामेश्वर यांचे वडील नारायण यांच्या नावे साडेआठ लाख रुपये, आई कासाबाई यांच्या नावे नऊ लाख रुपये आणि मुलगी अश्विनी हिच्या नावे पाच लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या.
ही रक्कम एकूण 22 लाख 50 हजार रुपये एवढी आहे. मात्र पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा समोर आला. यानंतर पैसे बुडाल्याच्या भीतीने शेतकऱ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुख्य संचालक अंबादास मानकापेंना अटक
आदर्श नागरी सहकारी संस्थेत झालेल्या घोटाळ्यात पोलिसांनी गुन्हा दाखल करताच मुख्य संचालक अंबादास आबाजी मानकापेंसह अन्य आरोपी फरार झाले होते. दरम्यान पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता.
दरम्यान अंबादास मानकापे यांना अखेर शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. अटकपूर्व जामिनासाठी कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी गोलवाडीत येताच मोठ्या चतुराईने सिडको पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांना खबऱ्याकडून खात्रीलायक माहिती मिळाली होती, त्यानुसार सापळा लावत मानकापेंना अटक करण्यात आली आहे.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…