क्राईम

डॉक्टर वेळेवर न आल्याने बड्या अधिकाऱ्याचा गेला नाहक बळी?

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागात कर्तव्य बजावणारे अधिकारी रवी राज यांच निधन झाल आहे. त्यांच निधन होण्यामागे रुग्णालय प्रशासन असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

रवी राज हे सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक होते. त्यांनी अनेकवेळा विमानतळावर अवैध ड्रग्ज, सोने आणि इतर वस्तूंच्या तस्करीविरोधात कारवाई करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे त्यांचं डिपार्टमेंटमध्ये चांगलं नाव होतं. त्यांच्या निधनानंतर सीमा शुल्क विभागातील अधिकारी वर्गात शोककळा पसरली आहे.

32 वर्षीय रवी राज यांना योग्यवेळी उपचार मिळाला असता तर त्यांचा जीव वाचू शकला असता. पण त्यांना ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजपणामुळे त्यांचा बळी गेला, असं रवी राज यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. रवी राज यांना रात्री तीनच्या सुमारास नवी मुंबईतील कामोठे येथे आपल्या निवासस्थानी छातीत दुखू लागलं होतं. त्यांना त्याचवेळी तातडीने उपचारांसाठी नजीकच्या मेडीसिक्योर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तिथे असलेल्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन मुख्य डॉक्टरांना फोन केला. मात्र ते डॉक्टर तब्बल दोन तास उशिराने आल्याने रवी राज यांचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात येतोय. रुग्णालय प्रशासनाकडून या दोन तासांत अनेकवेळा मुख्य डॉक्टरांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्याम रवी राज यांची प्रकृती आणखी खालावली. मात्र तरीही तेथील उपस्थित डॉक्टरांनी किंवा ज्यांना संपर्क केला त्या डॉक्टरांनी त्यांना लवकर आणि योग्य उपचारांसाठी इतर ठिकाणी हलवावे, अशाही सूचना केल्या नाहीत.

डॉक्टरांच्या या हलगर्जीपणामुळे रवी राज यांचा नाहक बळी गेल्याचा आरोप त्यांच्या पत्नी आणि सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी केलाय. रवी राज यांच्या निधनानंतर तिथे राहणारे त्यांच्या इतर सीमा शुल्क विभागाचे अधिकारी रुग्णालयाबाहेर जमा झाले. त्यांनी रुग्णालय आणि डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.

परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची दखल घेत कामोठे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र नातेवाईकांनी सदर घटनेचा पंचनामा करून मृत शरीर ताब्यात घेण्यास नकार दिला. रुग्णालयावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला.

अखेर पोलिसांनी रवी राज यांच्या नातेवाईकांना समजावून पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठविले. तो अहवाल आणि चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. दुसरकीडे या घटनेवर रुग्णालय प्रशासन काहीच बोलण्यास तयार नाही. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याचा नाहक जीव गेला, अशी चर्चा संबंधित परिसरात सुरु आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

16 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

1 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

1 दिवस ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago