शिरूर शहर व तालुक्यात बेकायदा गतीरोधकांचा हैदोस; अपघातांमध्ये वाढ, नागरिकांमध्ये संताप

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरासह संपूर्ण तालुक्यात रस्त्यांवर बेकायदेशीर व अशास्त्रीय पद्धतीने उभारण्यात आलेल्या गतीरोधकांमुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्याचबरोबर वाहनांच्या देखभालीवर मोठा खर्च ओढवत आहे, तर अनेक रस्त्यांवर वाहनांची प्रचंड कोंडी निर्माण होत असल्याने वाहतूक व्यवस्थेवर ताण येत आहे.

पुणे – नगर राष्ट्रीय महामार्गावरील सरदवाडी (ता. शिरूर) येथे खुप मोठे नियमबाह्य टाकण्यात आलेले असून गतीरोधक नागरिकांच्या जीवावर बेतत असून या ठिकाणी अनेक दुचाकीस्वार व फोर व्हीलर चालक अपघातग्रस्त झाले आहेत. रस्त्यांवर शास्त्रीय नियमानुसार गतीरोधक बसवण्याचे स्पष्ट नियम असतानाही अनेक ठिकाणी हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत.

गतीरोधक उभारण्यासाठी शासनाने ठरवलेली नियमावली स्पष्ट आहे. त्यानुसार,सामान्य रस्त्यांसाठी गतीरोधकाची रुंदी ३.७ मीटर व उंची १० सेंटीमीटर असावी. जिथे अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते अशा ठिकाणी, गतीरोधकाची लांबी ५ मीटर ठेवण्याचे नियम आहेत.परंतु प्रत्यक्षात, या मापदंडांकडे दुर्लक्ष करून अनेक ठिकाणी उंच, अरुंद, आणि अघोषित गतीरोधक उभारण्यात आले आहेत, जे थेट अपघातांना आमंत्रण देत आहेत.

बेल्हा – जेजुरी, शिरूर – आंबेगाव – जुन्नर मधून जाणारा अष्टविनायक महामार्ग हे रस्ते अलीकडेच दर्जेदार पद्धतीने विकसित करण्यात आले आहेत. मात्र या रस्त्यांवर बसवले गेलेले बेकायदेशीर आणि अपूर्णांक गतीरोधक वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहेत. “रस्ते उत्कृष्ट झाले पण गतीरोधकांनी प्रवास भयंकर केला” अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे.

राष्ट्रीय महामार्गावर गतीरोधक बसवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष समितीची परवानगी आवश्यक आहे. मात्र अनेक ठिकाणी ही परवानगी न घेता बेकायदेशीर गतीरोधक टाकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे वाहतूक कोंडी व अपघातांच्या घटनांत वाढ झाली आहे.

सध्या शासनाच्या नियमानुसार, गतीरोधक केवळ शाळा, रुग्णालय अशा अत्यावश्यक ठिकाणीच बसवले जातात. अपघात प्रवण ठिकाणी स्थानिक नागरिकांची मागणी असल्यास पोलीस ठाण्याचा अभिप्राय घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला जातो.

शिरूर ते रामलिंग जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवर गतीरोधक बसवण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतींना लेखी सूचनाही दिल्या आहेत. या गतीरोधकांचे नियोजन शास्त्रीय पद्धतीने करण्यात येईल, असेही विभागाकडून सांगण्यात आले आहे.

या संदर्भात माहिती देताना अनिल जाधव, सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, शिरूर यांनी सांगितले की,शहर व तालुक्यातील रस्त्यांवर अपघात कमी व्हावेत यासाठी गतीरोधक टप्याटप्याने शास्त्रीय पद्धतीने बसवले जातील. बेकायदेशीर गतीरोधकांवर कारवाईसाठी संबंधित ग्रामपंचायतींना सूचना पाठवण्यात आल्या आहेत.”

अपघातात जीव गमावणाऱ्या नागरिकांच्या कुटुंबीयांसह सर्वसामान्य जनतेमध्ये याविषयी तीव्र संताप असून, हे बेकायदेशीर गतीरोधक तातडीने हटवावेत व नवीन गतीरोधक केवळ शास्त्रीय नियमानुसारच बसवावेत, अशी जोरदार मागणी होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

7 तास ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

7 तास ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

7 तास ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

7 तास ago

एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…

7 तास ago

भारतातील आर्थिक-राजकीय संकटे! वास्तव आणि परिणाम विषयावर काँग्रेसचे चर्चासत्र १३ जूनला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…

7 तास ago