मुंबई : दादर रेल्वे स्थानक परिसरात लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरीच्या सलग घटनांनी रेल्वे पोलिसांसमोर आव्हान उभे केले होते. दोन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांच्या नजरेत आलेल्या ६५ वर्षीय महिलेचा अखेर पर्दाफाश झाला. पोलिसांनी तिसऱ्यांदा चोरी करण्यासाठी आलेल्या या महिलेला रंगेहात अटक केली. अनघा जोशी असे आरोपी महिलेचे नाव असून, ती मूळची पुण्याची रहिवासी असल्याचे तपासात समोर आले आहे.
CCTV फुटेजमुळे संशयित महिलेचा माग काढला
२ मे रोजी दादर स्थानकात बोरीवली लोकल पकडताना एका ४४ वर्षीय बँक कर्मचाऱ्या महिलेची सुमारे ६७ हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरीला गेली होती. त्यानंतर ६ जून रोजी याच स्थानकात एका फायनान्स एक्झिक्युटिव्ह महिलेचे सुमारे ८९ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरीला गेले.
दोन्ही घटनांचा तपास करताना रेल्वे पोलिसांनी स्थानकातील CCTV फुटेज तपासले. त्यावेळी चोरीच्या घटनांच्या आसपास एक वृद्ध महिला संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. पोलिसांनी तिच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.
‘लकी शनिवार’ मानून पुण्याहून मुंबईत यायची
तपासादरम्यान अनघा जोशी ही महिन्यातील पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी पुण्याहून मुंबईत येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे दिवस चोरीसाठी ‘लकी’ असल्याचा तिचा समज असल्याचे तपासात समोर आले. तिसऱ्यांदा चोरी करण्यासाठी ती मुंबईत आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिला रंगेहात पकडले.
२० वर्षांपूर्वीही साखळी चोरी केल्याचे समोर
पोलिसांच्या चौकशीत अनघा जोशीची जुनी गुन्हेगारी पार्श्वभूमीही समोर आली. सुमारे २० वर्षांपूर्वी ती साखळी चोरीच्या घटनांमध्ये सहभागी होती. काही महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावल्याचेही तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर तिने चोरीचा मार्ग सोडून संसार सुरू केला होता.
मात्र मुलाचा अपघाती मृत्यू आणि पतीच्या निधनानंतर तिच्यावर आर्थिक संकट आले. त्यानंतर तिने पुन्हा चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
मुंबईत चोरी, पुण्यात दागिन्यांची विक्री
पोलिसांच्या माहितीनुसार, अनघा जोशी मुंबईतून चोरलेले दागिने पुण्यात नेऊन सराफांकडे विकत होती. पोलिसांनी पुण्यातील संबंधित सराफांकडून चोरीचे दागिने हस्तगत केल्याचे सांगण्यात आले आहे.आरोपी महिलेला न्यायालयात हजर करण्यात आले असून, तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.
मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने…
मुंबई: विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आरोग्य सुविधा आणि विद्यार्थीपूरक वातावरण उपलब्ध करून देणे ही विद्यापीठांची जबाबदारी आहे.…
मुंबई: २२व्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप-२०२६ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सुवर्णपदक…
मुंबई: पुणे येथे २०३२ मध्ये ‘यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप’ आयोजित करण्यासाठी निविदा सादर करण्यास महाराष्ट्र…
मुंबई: लावणी म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली कला. तिच्या ठेक्यात महाराष्ट्राचा इतिहास आहे, शब्दांत लोकजीवन आहे…
मुंबई: नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातील युवकांना क्रीडा क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय…