crime
मंचर (कैलास गायकवाड): खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील धुमाळस्थळ वस्तीमध्ये संदीप बबन धुमाळ (रा. धुमाळ स्थळ) या शेतकऱ्याच्या तात्पुरत्या लाकूड आणि बाजरीच्या सरमाडाने केलेल्या कांदा वखारीला अज्ञात व्यक्तीने आग लावून दिल्याने सुमारे अडीचशे पिशव्या कांद्याचे नुकसान झाले आहे.
सध्याच्या चालू असलेल्या बाजारभावाप्रमाणे अंदाजे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. अडीचशे पिशवी कांदा आगी पासून वाचण्यात यश आले आहे. मच्छिंद्र कानिफनाथ धुमाळ, अतुल दगडू धुमाळ, अजय बाळासाहेब धुमाळ व इतर शेतकऱ्यांनी वखारीकडे धाव घेत पाणी मारून आग आटोक्यात आणली. त्यामुळे बरेचसे नुकसान होणारे वाचले.
कांद्याच्या वखारी शेजारी रिकामी पेट्रोलची बाटली सापडल्यामुळे कुणीतरी आज्ञात व्यक्तीने वखार पेटवून दिली, अशा आशयाची तक्रार संदीप बबन धुमाळ यांनी पारगाव पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कालेकर हे प्रभारी अधिकारी सपोनि गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
शिरूर शहर व तालुक्यात ‘कामगार साहित्य वाटप’ योजनेच्या नावाखाली दलालीचा उघड धंदा
Video: वाघाळे येथे ग्रामस्थांचा वाढदिवस एकत्रित साजरा…
चिमुकल्यांच्या आक्रोशात दडलेली व्यवस्था; रांजणगावातील तिहेरी हत्याकांडाचा आरसा
शिरूर – पाबळ रस्ता क्र. १०३ चे निकृष्ट काम; निलेश वाळुंज यांचे शिरूर तहसील कार्यालय येथे उपोषण सुरु
शिरुर; वरुनराजाची कृपा झाली अन अनेक दशकानंतर मे महिन्यात मोटेवाडीचा तलाव तुडुंब भरला
मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…
मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…
पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…
शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…
पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…
पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या…