crime
मंचर (कैलास गायकवाड): खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील धुमाळस्थळ वस्तीमध्ये संदीप बबन धुमाळ (रा. धुमाळ स्थळ) या शेतकऱ्याच्या तात्पुरत्या लाकूड आणि बाजरीच्या सरमाडाने केलेल्या कांदा वखारीला अज्ञात व्यक्तीने आग लावून दिल्याने सुमारे अडीचशे पिशव्या कांद्याचे नुकसान झाले आहे.
सध्याच्या चालू असलेल्या बाजारभावाप्रमाणे अंदाजे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. अडीचशे पिशवी कांदा आगी पासून वाचण्यात यश आले आहे. मच्छिंद्र कानिफनाथ धुमाळ, अतुल दगडू धुमाळ, अजय बाळासाहेब धुमाळ व इतर शेतकऱ्यांनी वखारीकडे धाव घेत पाणी मारून आग आटोक्यात आणली. त्यामुळे बरेचसे नुकसान होणारे वाचले.
कांद्याच्या वखारी शेजारी रिकामी पेट्रोलची बाटली सापडल्यामुळे कुणीतरी आज्ञात व्यक्तीने वखार पेटवून दिली, अशा आशयाची तक्रार संदीप बबन धुमाळ यांनी पारगाव पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कालेकर हे प्रभारी अधिकारी सपोनि गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
शिरूर शहर व तालुक्यात ‘कामगार साहित्य वाटप’ योजनेच्या नावाखाली दलालीचा उघड धंदा
Video: वाघाळे येथे ग्रामस्थांचा वाढदिवस एकत्रित साजरा…
चिमुकल्यांच्या आक्रोशात दडलेली व्यवस्था; रांजणगावातील तिहेरी हत्याकांडाचा आरसा
शिरूर – पाबळ रस्ता क्र. १०३ चे निकृष्ट काम; निलेश वाळुंज यांचे शिरूर तहसील कार्यालय येथे उपोषण सुरु
शिरुर; वरुनराजाची कृपा झाली अन अनेक दशकानंतर मे महिन्यात मोटेवाडीचा तलाव तुडुंब भरला
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…