क्राईम

मोबाईल पासवर्डही ठरतोय सुखी संसारात अडथळा, कसा तो पहा…

मुंबई: पती-पत्नीतील वाद हा नवा नाही. सामानाची यादी-खरेदी, मुलांचे शिक्षण, आई-वडिलांची जबाबदारी, नवीन वस्तूची खरेदी, आर्थिक परिस्थिती अशा कित्येक कारणांमुळे असे वाद घडताना दिसतात. पण अलीकडे हे वाद मिटवायचे कोणी, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. एकत्रित कुटुंबापासून अलिप्त राहणार्‍या उच्चशिक्षित दाम्पत्यांच्या भांडणात माघार कोण घेणार, यावरुन हा वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचू लागला आहे.
कोरोना काळात अनेकांनी झटपट लग्नाचे निर्णय घेतले. या काळात झालेल्या लग्नावेळी मुलगा पुणे, मुंबईत नोकरीला होता असे सांगण्यात आले होते. पण तिकडची नोकरी गेल्याने अनेक मुले नव्याने काही व्यवसाय करु लागली. असे अनेक तरुण आपापल्या गावात, शहरात स्थिरावत आहेत. पण लग्नावेळी पुणे, मुंबईत नोकरीची खोटी माहिती का दिली, आमची मुलगी तिकडे राहणार होती, अशा तक्रारी पालक घेऊन येत आहेत.
फोनचा पासवर्ड सांगत नाही
पतीचे (वय 54), तर पत्नीचे (वय 50) प्रेमविवाह झालेल्या या दाम्पत्यामध्येही वाद झाला. या वादाचे कारण ठरले ते म्हणजे मोबाईल पासवर्ड. लग्नाला 30 वर्षांचा काळ लोटल्यानंतरही एकमेकांवर मोबाईलवरुन घेतला जाणारा संशय खर्‍याअर्थाने सर्वांनाच विचार करायला लावणार आहे.
शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

12 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

20 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago