क्राईम

रांजणगाव MIDC मध्ये कामगाराचा उंचावरुन पडल्याने मृत्यू…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC तील K K नाग कंपनीत उंचावरुन पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील के के नाग कंपनीत गोडाऊनचा पत्रा बसवण्याचे काम चालू होते. यावेळी जोरात वारा आल्याने हे काम करणारा कामगार वरुन खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारापुर्वी मृत्यू झाला. विठ्ठल सिताराम कदम (वय २१, रा. काळुस ता खेड जि पुणे) असे या कामगाराचे नाव आहे. याबाबत तुकाराम कदम यांनी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘विठ्ठल कदम हा रविवारी (ता. १०) के के नाग कंपनीत गोडाऊनचा पत्रा बसविण्याचे काम करत होता. दुपारी १ च्या सुमारास जोराचा वारा आल्याने त्याचा तोल गेला त्यामुळे तो थेट खाली पडला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला तातडीने शिरुर येथील खाजगी दवाखान्यात उपचारांसाठी हलविण्यात आले. परंतु, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत रांजणगाव पोलिस ठाण्यात सदर कामगाराचा भाऊ तुकाराम कदम याने फिर्याद दाखल केली आहे. रांजणगाव MIDC चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गणेश आगलावे पुढील तपास करत आहेत.’

unique international school
शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

10 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

11 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

11 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

11 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

12 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

12 तास ago