क्राईम

अपघाताचा थरार! शिक्रापूर-चाकण रस्त्यावर कंटेनरने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं…

शिक्रापूर: शिक्रापूर-चाकण रस्त्यावर भरधाव मालवाहतूक कंटेनरने दहा ते बारा गाड्यांना जोरात धडक दिली आहे. अपघातात अनेक जण जखमी झाले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

चाकणमधील माणिक चौकात कंटेनर चालकाने तीन महिलांना उडवले. कंटेनरसह पळून जाण्याच्या प्रयत्नात चालक भरधाव वेगात निघाला होता. त्या भीतीपोटी तो सुसाट वेगाने पळ काढू लागला. काही अंतरावर त्याने एका मुलीच्या पायावरून गाडी घातली. त्यानंतर चाकण पोलिसांनी पाठलाग सुरु केला, हे पाहून चालकाने कंटेनरचा वेग वाढवला. वाटेत येणाऱ्या वाहनांना उडवत तो बेफाम निघाला होता. पुढे शिक्रापूर पोलिसांची गाडी त्याला रोखण्यासाठी थांबली होती. मात्र, कंटेनर चालकाने पोलिसांच्या वाहनाला ही धडक दिली. यात ट्रॅफिक वॉर्डन किरकोळ जखमी झाला आहे. चाकण ते जातेगाव या वीस किलोमीटर अंतरापर्यंत ही थरारक घटना घडली.

अपघाताने मोठा गदारोळ निर्माण झाला, अखेर नागरिकांनी कंटेनरला रोखले आणि चालकाला खाली खेचून बेदम चोप दिला. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. सुदैवाची बाब म्हणजे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातानंतर नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. या थरारक घटनेचे व्हिडीओ देखील समोर आला आहे.

अपघातात अनेक जण जखमी ही झाले आहेत. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. चालकाला शिक्रापूर हद्दीत नागरिकांनी अडवून चांगलाच चोप दिला. शिक्रापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरूर! अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघातात दोन ठार तर एक जखमी…

सणसवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे यांचे अपघाती निधन…

Video; पुणे-नगर रस्त्यावर फलके मळा येथे दोन दुचाकीच्या भीषण अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी

तळेगाव-न्हावरे रोडवर अपघातात जेष्ठ नागरिकाचा मृत्यू…

केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

3 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

3 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

4 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

4 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

4 तास ago

बारावी निकाल 89.79% : यशस्वी विद्यार्थ्यांचे दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन

आवडीनुसार पुढील वाटचालीचे आवाहन; मुलींची उत्तीर्णता मुलांपेक्षा 6.35% अधिक मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12…

4 तास ago