क्राईम

शिरूर पोलिसांकडून रक्षाबंधनच्या दिवशी नागरिकांना मोबाईल परत…

पोलिस अंमलदार सोनाजी तावरे यांनी आत्तापर्यंत ३० मोबाईल केले मुळ मालकांना सुपुर्त
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी रक्षाबंधनच्या दिवशी नागरिकांना त्यांचे चोरीला गेलेले, गहाळ झालेले ३० मोबाईल परत केले आहेत. यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

मोबाईल गहाळ, हरवल्याच्या, चोरी गेल्याच्या तक्रारी नागरिकांकडून शिरूर पोलिस स्टेशनला वेळोवेळी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने तपास करत २० मोबाईल हस्तगत केल्यानंतर पुन्हा एकदा गहाळ, चोरीला गेलेले मोबाईल वापरणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून १० मोबाईल पोलिस अंमलदार सोनाजी तावरे यांनी शोधून काढून रक्षाबंधनच्या दिवशी नागरिकांना परत केले आहे. त्यामुळे पोलिस अंमलदार सोनाजी तावरे यांच्यावर त्यांच्या या कामगिरी बद्दल शिरूर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पोलिस अंमलदार सोनाजी तावरे यांनी अक्कलकोट, बीड, चाकण, पुणे, सांगली, या परीसरात मोबाईल वापरणाऱ्यांचा शोध घेऊन गहाळ झालेले मोबाईल मुळ नागरीकांना परत मिळवून दिले आहेत. पोलिस निरीक्षक संजय जगताप, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार सोनाजी तावरे यांनी ही कामगिरी केली आहे.

शिरूर पोलिस स्टेशन आवारातील २२० वाहने मिळणार मालकांना…

शिरूर पोलिसांनी अंतरजिल्हा मोटर सायकल चोरांना ठोकल्या बेडया…

कृषी पंप व केबल चोरी करणारी टोळी शिरूर पोलिसांनी केली गजाआड…

शिरूर पोलिस स्टेशनमधील पोलिसावर धारदार शस्त्राने वार…

शिरूर पोलिसांनी मोटार चालकाकडून तब्बल २४ हजारांचा दंड केला वसूल…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

29 मिनिटे ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

2 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

7 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

7 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

7 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

7 तास ago