Money
शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील आनंद नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवहार ठप्प झाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष अभय चोरडिया यांनी ठेवीदारांना विश्वासात घेऊन त्यांच्या ठेवी एप्रिलमध्ये परत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्याचे पालन न करता ते पुन्हा फरार झाले असून, त्यांच्यासोबत अन्य संचालक देखील फरार झाल्यामुळे ठेवीदार हवलदिल झाले आहेत.
पतसंस्थेच्या दारात रोज जाऊन वाट पाहू लागले. तब्बल ३० दिवस वाट पाहून त्यांचा हिरमोड झाला. शेवटी त्यांनी संचालकांच्या व्यापारी ठिकाणांवर जाऊन आपल्या भावना व्यक्त करायचा निर्णय घेतला. एकत्रित होऊन सगळ्यांनी संस्थेचे अध्यक्ष अभय चोरडिया आणि विनय संघवी आणि भटेवरा यांच्याशी संबंधित व्यावसायिक ठिकाणी जाऊन निदर्शने केली.
संस्थेत चाललेले आर्थिक गैरव्यवहार सभासद, ठेवीदार, व सहकार निबंधक यांच्यापासून लपवून ठेवण्यात सर्व संचालक, अंतर्गत लेखापरीक्षक आणि संस्थेचे प्रबंधक यांचा सहभाग असल्याने सर्व ठेवीदारांमधे रोष निर्माण झाला. संस्थेशी संबंधित कोणीही ठेवीदारांच्या समोर येण्यास तयार नसल्याने ठेवीदारांनी मेघराज हंसराज चोरडिया, सुवर्णा राजेंद्र भटेवरा, विनय संघवी आणि तज्ञ संचालक उज्वला देसरडा यांच्या व्यापारी आस्थापना व घरासमोर जाऊन प्रतिकात्मक निदर्शने केली. घोषणा दिल्या. याउपरांत त्यांनी ठेवीदारांची रक्कम देण्यासंबंधी काही हालचाल न केल्यास दररोज सर्व जबाबदार संचालकांच्या समोर अशीच निदर्शने व गरज पडल्यास उपोषण व आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मे.मेघराज हंसराज अँड सन्स, मेघहंस सेल्स, मेघहंस एंटरप्रायजेस, मेघहंस असोसिएट्स, गोडगंगा फूड्स एस एल पी या संस्थांनी चेअरमन अभय चोरडिया यांच्यामार्फत संस्थेच्या रकमेचा अपहार करून ठेवीदारांची रक्कम हडप केल्याचे निदर्शनास येत असून अन्य संचालक, लेखापरीक्षक, आणि प्रबंधक यांनी या अफरातफरीवर बऱ्याच काळापासून पांघरूण घालून ठेवीदारांचा विश्वासघात केला आहे.
नागरिकांनी आपली कष्टाने कमावलेली रक्कम या सर्व संचालकांच्या विश्वासावर या पतसंस्थेत गुंतविली आहे. अनेक ठेवीदारांना त्यांच्या अडचणीच्या काळात ठेवींच्या रकमा मिळत नाहीत. त्यामुळे हे ठेवीदार आंदोलक अजून तिव्र लढा देण्याच्या तयारीत आहेत. सर्व संचालक स्थानिक व्यापारी असून गडगंज श्रीमंत आहेत. तसेच जवळपास सर्वच ठेवीदार स्थानिक आहेत. त्यामुळे आंदोलन दिर्घकाळ चालू राहून या सर्वांना त्याची झळ सोसावी लागणार आहे. यापुढे आंदोलन आधिक तीव्र करून या संचालकांना व्यवसाय व साधारण जगणे असह्य करण्याचा निर्धार ठेवीदारांनी केला आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…