मुख्य बातम्या

शिरुरमध्ये नागरीकांचे पैसे बुडवून पतसंस्थेचा अध्यक्ष फरार; ठेवीदारांची निदर्शने…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील आनंद नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवहार ठप्प झाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष अभय चोरडिया यांनी ठेवीदारांना विश्वासात घेऊन त्यांच्या ठेवी एप्रिलमध्ये परत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्याचे पालन न करता ते पुन्हा फरार झाले असून, त्यांच्यासोबत अन्य संचालक देखील फरार झाल्यामुळे ठेवीदार हवलदिल झाले आहेत.

पतसंस्थेच्या दारात रोज जाऊन वाट पाहू लागले. तब्बल ३० दिवस वाट पाहून त्यांचा हिरमोड झाला. शेवटी त्यांनी संचालकांच्या व्यापारी ठिकाणांवर जाऊन आपल्या भावना व्यक्त करायचा निर्णय घेतला. एकत्रित होऊन सगळ्यांनी संस्थेचे अध्यक्ष अभय चोरडिया आणि विनय संघवी आणि भटेवरा यांच्याशी संबंधित व्यावसायिक ठिकाणी जाऊन निदर्शने केली.

संस्थेत चाललेले आर्थिक गैरव्यवहार सभासद, ठेवीदार, व सहकार निबंधक यांच्यापासून लपवून ठेवण्यात सर्व संचालक, अंतर्गत लेखापरीक्षक आणि संस्थेचे प्रबंधक यांचा सहभाग असल्याने सर्व ठेवीदारांमधे रोष निर्माण झाला. संस्थेशी संबंधित कोणीही ठेवीदारांच्या समोर येण्यास तयार नसल्याने ठेवीदारांनी मेघराज हंसराज चोरडिया, सुवर्णा राजेंद्र भटेवरा, विनय संघवी आणि तज्ञ संचालक उज्वला देसरडा यांच्या व्यापारी आस्थापना व घरासमोर जाऊन प्रतिकात्मक निदर्शने केली. घोषणा दिल्या. याउपरांत त्यांनी ठेवीदारांची रक्कम देण्यासंबंधी काही हालचाल न केल्यास दररोज सर्व जबाबदार संचालकांच्या समोर अशीच निदर्शने व गरज पडल्यास उपोषण व आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मे.मेघराज हंसराज अँड सन्स, मेघहंस सेल्स, मेघहंस एंटरप्रायजेस, मेघहंस असोसिएट्स, गोडगंगा फूड्स एस एल पी या संस्थांनी चेअरमन अभय चोरडिया यांच्यामार्फत संस्थेच्या रकमेचा अपहार करून ठेवीदारांची रक्कम हडप केल्याचे निदर्शनास येत असून अन्य संचालक, लेखापरीक्षक, आणि प्रबंधक यांनी या अफरातफरीवर बऱ्याच काळापासून पांघरूण घालून ठेवीदारांचा विश्वासघात केला आहे.

नागरिकांनी आपली कष्टाने कमावलेली रक्कम या सर्व संचालकांच्या विश्वासावर या पतसंस्थेत गुंतविली आहे. अनेक ठेवीदारांना त्यांच्या अडचणीच्या काळात ठेवींच्या रकमा मिळत नाहीत. त्यामुळे हे ठेवीदार आंदोलक अजून तिव्र लढा देण्याच्या तयारीत आहेत. सर्व संचालक स्थानिक व्यापारी असून गडगंज श्रीमंत आहेत. तसेच जवळपास सर्वच ठेवीदार स्थानिक आहेत. त्यामुळे आंदोलन दिर्घकाळ चालू राहून या सर्वांना त्याची झळ सोसावी लागणार आहे. यापुढे आंदोलन आधिक तीव्र करून या संचालकांना व्यवसाय व साधारण जगणे असह्य करण्याचा निर्धार ठेवीदारांनी केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

3 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

3 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

3 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

3 तास ago

महाराष्ट्रात डिजिटल प्रॉपर्टी कार्डची तयारी; मालमत्ता व्यवहार होणार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक.

मुंबई : राज्यातील जमिनीच्या आणि मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि मालकी हक्क अधिक बळकट करण्यासाठी…

3 तास ago

अनेक आजारांवर एरंडेल तेल गुणकारी

रात्रीचं जागरण, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता…

3 तास ago