क्राईम

शिरूर तालुक्यात मुलाच्या निधनाने वडिलांची नैराश्यातून आत्महत्या…

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे लोणीकंद येथील बापुराव साळवे यांनी मुलाच्या निधनानंतर नैराश्यातून कोरेगाव भीमा येथील पुलावरून उडी मारत आत्महत्या केली आहे. याबाबत त्यांची पत्नी सुमन साळवे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.

सुमन साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बापुराव साळवे यांना पहिल्या पत्नी पासून राहुल साळवे नावाचा मुलगा होता. तो त्याच्या मामाचे घरी राहत होता. २५/१०/२०२३ रोजी त्याचा मृत्यू झाला होता. बापुराव यांना दारूचे व्यसन होते. त्यांचा मुलगा राहुल हा बुधवारी (ता. २५) मयत झाल्यामुळे पती यांनी मला मी मुलगा मेल्यामुळे आत्महत्या करणार आहे असे म्हणून घरातून सकाळी ०६/०० वा निघुन गेले होते.

बापुराव बेलाजी साळवे (वय ५०, रा. लोणीकंद ता. हवेली) यांनी कोरेगाव भीमा (ता. शिरूर, जि. पुणे) येथील भीमा नदीच्या पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्या केली. त्यांना स्थानिकांनी ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर येथे अॅम्बुलन्सने पाठविले होते. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल श्री. मोरे करत आहेत.

शिरुर-रामलिंग रस्त्यावर दुचाकीला धडक; महाविद्यालयीन युवती ठार….

शिरूर तालुक्यात मुलीच्या अंगावरील गोधडी ओढून केला विनयभंग…

शिरुर तालुक्यात एका युवकाची पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांसोबत वादावादी अन नंतर फाशी घेत आत्महत्या

शिरुर तालुक्यात एका युवकाची पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांसोबत वादावादी अन नंतर फाशी घेत आत्महत्या

शिरूर तालुका आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य; धीरेंद्र शास्त्रीविरोधात संतापाची लाट

मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तीव्र…

6 मिनिटे ago

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

2 तास ago

हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते…

2 तास ago

मुंबईत 27-28 एप्रिलला आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीट; एमएसएमई उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी

मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत…

2 तास ago

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…

3 तास ago

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

24 तास ago