शिरूर तालुका

शिरूर-पाबळ रस्त्यावरील पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-पाबळ रस्त्यावरील अण्णापूर ते आमदाबाद फाटा (माशेरेवस्ती) नजीकच्या ओढ्यावरील पुलाच्या डांबरीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडले आहे. पुलावर खडीचे ढिग अस्ताव्यस्त पसरले असल्याने येथे वारंवार छोटे-मोठे अपघात घडत आहे. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावरील उडणा-या धुळीमुळे वाहनचालक, पादचारी त्रस्त झाले आहेत. पुलावर पडलेल्या खड्डयांमुळे व अस्ताव्यस्त पसरलेल्या खडीमुळे ग्रामस्थांबरोबर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

शिरूर – पाबळ रस्ता पुढे मलठण (ता.शिरूर) येथे अष्टविनायक महामार्गाला जोडला जात असल्याने वाहनांची नेहमीच वर्दळ असते. वाहतूकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यावरील आमदाबाद फाटा जवळील माशेरेवस्ती नजीकच्या ओढ्यावरील पुलाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. गेल्या काही महिन्यापासून पुलावरील डांबरीकरणाचे काम रखडले असून, पुलावर खड्डे पडले आहे. खडी अस्ताव्यस्त पसरली आहे. यामुळे शालेय विद्यार्थी, वाहनचालक अनेकदा घसरून पडून छोटेमोठे अपघात घडत आहे. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले असून, तत्काळ पुलावरील डांबरीकरणाचे काम मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांनी केली आहे.

‘अण्णापूर ते आमदाबाद फाटा (माशेरेवस्ती) नजीकच्या ओढ्यावरील पुलाच्या डांबरीकरणाचे काम पावसाळ्यात होऊ शकले नाही. आता याबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना सुचना देऊन तत्काळ काम पूर्ण केले जाईल.’
– अनिल जाधव, सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग शिरूर

‘माशेरेवस्ती येथील पुलावर खड्डे पडल्याने व खडी अस्ताव्यस्त पसरल्याने वारंवार अपघात घडत आहेत. धुळीचा प्रचंड त्रास होत आहे. दररोज प्रवास करणे मुश्किल झाले आहे.’
– आशिष जगताप, वाहनचालक

शिरुर-रामलिंग रस्त्यावर दुचाकीला धडक; महाविद्यालयीन युवती ठार….

शिरुर तालुक्यात रस्ता दुरुस्तीसाठी तरुणांचे अनोखे आंदोलन, सहकाऱ्यांसह घेणार थेट जलसमाधी…?

न्हावरा फाटा ते चौफुला रस्त्यावर रस्ता रुंदीकरणासाठी झाडांची कत्तल

शिक्रापूर पाबळ रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा

शिरूर तालुका आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

18 मिनिटे ago

हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते…

21 मिनिटे ago

मुंबईत 27-28 एप्रिलला आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीट; एमएसएमई उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी

मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत…

24 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…

2 तास ago

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

22 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

22 तास ago