shirur-hut-fire
शिरूर (अरुणकुमार मोटे): भूमिहीन असल्याने परिस्थितीवर मात करण्यासाठी मोलमजुरीचे काम करणारी पत्नी संसाराचा गाडा हाकत असताना घरगुती व प्रापंचिक कारणावरून रागाचे भरात नवऱ्याने स्वतःचची झोपडी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता. १४) रात्री टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे घडल्याने जनतेतून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत उषा संतोष पवार (वय २७) यांनी शिरूर पोलिसांत पती संतोष वसंत पवार याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील बोटा येथील रहिवासी असलेले पवार कुटुंब उदरनिर्वाहासाठी टाकळी हाजी येथील शिनगरवाडी जवळ राहत आहे. सायंकाळी जेवण करत असताना उषा हिने माझ्या सोबत मजुरीच्या कामाला चला असे म्हटल्याचा राग पती संतोषला आल्याने त्याने स्वतःचीच झोपडी पेटवून दिली.
आगीमध्ये घरातील सर्व साहित्याची झाली राखरांगोळी…
झोपडी पेटल्यानंतर शेजाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. शेतकऱ्यांनी याबाबत माजी सरपंच दामूशेठ घोडे यांना कळविताच ते तत्काळ पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिस आल्याची चाहुल लागतच संतोष तेथून पसार झाला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक कारंडे करीत आहेत.
दरम्यान, पतीला दारूचे व्यसन असल्याने वारंवार त्रास देत आहे. आज ना उद्या सुधारेल या आशेवर आजवर आवाज उठविला नाही. स्वतःच्या कष्टाने मुलीचे लग्न केले असून मुलगा आश्रमशाळेत शिकत आहे. दररोज मीच कामाला जायचे, संतोष हा मात्र फक्त दारु पिऊन घरी गोंधळ घालत असतो. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून मला जीवे मारण्याची धमकी दिल्याने पोलिसांत तक्रार द्यावी लागली, असे उषा पवार यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यातील त्या भागात एकाच रात्री पाच शेतकऱ्यांच्या कृषी पंप व केबलची चोरी
शिरुर; माझ्या मुलाचा एवढा काय गुन्हा होता…? त्यांनी एवढं निर्दयीपणे त्याला का मारलं…?
सेवानिवृत्त नायब तहसीलदार श्रीधर तांबे यांचे निधन
रांजणगाव MIDC पोलिसांनी उसतोड मजुर पत्नीचा खुन करुर फरार झालेल्या आरोपीस केली अटक
शिरुर तालुक्यात कंटेनर इलेक्ट्रिक पोलला धडकून कंटेनर मधील २१ लाखाचे पार्सल जळून खाक…
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…