shirur-hut-fire
शिरूर (अरुणकुमार मोटे): भूमिहीन असल्याने परिस्थितीवर मात करण्यासाठी मोलमजुरीचे काम करणारी पत्नी संसाराचा गाडा हाकत असताना घरगुती व प्रापंचिक कारणावरून रागाचे भरात नवऱ्याने स्वतःचची झोपडी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता. १४) रात्री टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे घडल्याने जनतेतून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत उषा संतोष पवार (वय २७) यांनी शिरूर पोलिसांत पती संतोष वसंत पवार याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील बोटा येथील रहिवासी असलेले पवार कुटुंब उदरनिर्वाहासाठी टाकळी हाजी येथील शिनगरवाडी जवळ राहत आहे. सायंकाळी जेवण करत असताना उषा हिने माझ्या सोबत मजुरीच्या कामाला चला असे म्हटल्याचा राग पती संतोषला आल्याने त्याने स्वतःचीच झोपडी पेटवून दिली.
आगीमध्ये घरातील सर्व साहित्याची झाली राखरांगोळी…
झोपडी पेटल्यानंतर शेजाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. शेतकऱ्यांनी याबाबत माजी सरपंच दामूशेठ घोडे यांना कळविताच ते तत्काळ पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिस आल्याची चाहुल लागतच संतोष तेथून पसार झाला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक कारंडे करीत आहेत.
दरम्यान, पतीला दारूचे व्यसन असल्याने वारंवार त्रास देत आहे. आज ना उद्या सुधारेल या आशेवर आजवर आवाज उठविला नाही. स्वतःच्या कष्टाने मुलीचे लग्न केले असून मुलगा आश्रमशाळेत शिकत आहे. दररोज मीच कामाला जायचे, संतोष हा मात्र फक्त दारु पिऊन घरी गोंधळ घालत असतो. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून मला जीवे मारण्याची धमकी दिल्याने पोलिसांत तक्रार द्यावी लागली, असे उषा पवार यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यातील त्या भागात एकाच रात्री पाच शेतकऱ्यांच्या कृषी पंप व केबलची चोरी
शिरुर; माझ्या मुलाचा एवढा काय गुन्हा होता…? त्यांनी एवढं निर्दयीपणे त्याला का मारलं…?
सेवानिवृत्त नायब तहसीलदार श्रीधर तांबे यांचे निधन
रांजणगाव MIDC पोलिसांनी उसतोड मजुर पत्नीचा खुन करुर फरार झालेल्या आरोपीस केली अटक
शिरुर तालुक्यात कंटेनर इलेक्ट्रिक पोलला धडकून कंटेनर मधील २१ लाखाचे पार्सल जळून खाक…
मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…
मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…
शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…