मुंबई: गडचिरोलीत नरभक्षक वाघाने 2 दिवसात 2 नागरिकांचा बळी घेतला आहे. या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी उसेगाव येथे गावकऱ्यांनी तात्काळ एक बैठक बोलावली. गावकरी व ग्रामपंचायतचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी व सीसीएफ कार्यालयाला भेट देऊन तात्काळ नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याची मागणी करणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी या नरभक्षक वाघाने आत्तापर्यंत १७ नागरिकांना ठार केले असल्याची माहिती आहे.
गडचिरोली तालुक्यातील कळमटोला येथील जंगलात गुरे चराईकरिता गेलेल्या व्यक्तीस वाघाने ठार केले. ही घटना दुपारी २ च्या सुमारास अमिर्झा-गडचिरोली मार्गापासून दीड किलोमीटर आत कक्ष क्र. ४१५ या जंगलात घडली. कृष्णा महागू ढोणे असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांनतर देसाईगंज तालुक्यातील उसेगाव येथे आणि गडचिरोली तालुक्यात एका व्यक्तीस वाघाने ठार केले.
सातत्याने वाघाचे हल्ले होत असल्याने गडचिरोलीत सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. वाघाचे अस्तित्व असलेल्या जंगलात एकट्याने जाऊ नये, असे वनविभाग वारंवार सांगत असतानाही अनेक जण सूचनांकडे डोळेझाक करतात. त्यामुळे वाघाच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.
मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…
मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…
मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…
पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…
मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…