क्राईम

वाघाच्या हल्ल्यात दोन नागरिकांचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद

मुंबई: गडचिरोलीत नरभक्षक वाघाने 2 दिवसात 2 नागरिकांचा बळी घेतला आहे. या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी उसेगाव येथे गावकऱ्यांनी तात्काळ एक बैठक बोलावली. गावकरी व ग्रामपंचायतचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी व सीसीएफ कार्यालयाला भेट देऊन तात्काळ नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याची मागणी करणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी या नरभक्षक वाघाने आत्तापर्यंत १७ नागरिकांना ठार केले असल्याची माहिती आहे.

गडचिरोली तालुक्यातील कळमटोला येथील जंगलात गुरे चराईकरिता गेलेल्या व्यक्तीस वाघाने ठार केले. ही घटना दुपारी २ च्या सुमारास अमिर्झा-गडचिरोली मार्गापासून दीड किलोमीटर आत कक्ष क्र. ४१५ या जंगलात घडली. कृष्णा महागू ढोणे असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांनतर देसाईगंज तालुक्यातील उसेगाव येथे आणि गडचिरोली तालुक्यात एका व्यक्तीस वाघाने ठार केले.

सातत्याने वाघाचे हल्ले होत असल्याने गडचिरोलीत सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. वाघाचे अस्तित्व असलेल्या जंगलात एकट्याने जाऊ नये, असे वनविभाग वारंवार सांगत असतानाही अनेक जण सूचनांकडे डोळेझाक करतात. त्यामुळे वाघाच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

7 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

8 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

9 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

13 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

13 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

14 तास ago