शिक्रापूर चाकण रस्त्यावरील वाजेवाडी येथील अपघात
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावरून मद्यधुंद अवस्थेत ट्रक घेऊन जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मारुती सायबा खाडे व लक्ष्मण मारुती खाडे या बापलेकांचा मृत्यू झाला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे श्रावण वसंत गव्हाळे या ट्रक चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर चाकण रस्त्यावरील वाजेवाडी येथून लक्ष्मण खाडे रामा खाडे दोघे भाऊ व त्यांचे वडील मारुती खाडे हे २० एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या जवळील एम एच २३ बी एफ ०६८९ या दुचाकीहून चाललेले असताना वाजेवाडी जवळील हॉटेल कावेरी समोरून जात असताना पाठीमागून मद्यधुंद अवस्थेत आलेल्या एम एच १४ जे एल ६८५३ या ट्रकने खाडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक देत खाडे यांची दुचाकी काही अंतर ओढत नेली. यावेळी दुचाकीवरील तिघे बापलेक काही अंतर दुचाकीसह फरपटत गेल्याने गंभीर जखमी झाले.
दरम्यान काही नागरिकांनी सदर जखमींना उपचारासाठी शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच अपघातात मारुती सायबा खाडे (वय ५५) व लक्ष्मण मारुती खाडे (वय २८) दोघे सध्या रा. मांजरेवाडी (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. वंजारवाडी (ता. शिरुर) कासार जि. बीड हे दोघे मयत झाले असून रामा मारुती खाडे (वय ३५) सध्या रा. मांजरेवाडी (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. वंजारवाडी (ता. शिरुर) कासार जि. बीड हा गंभीर जखमी झाला असल्याची घटना घडली.
याबाबत रामा मारुती खाडे (वय ३५) सध्या रा. मांजरेवाडी (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. वंजारवाडी (ता. शिरुर) कासार जि. बीड यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी श्रावण वसंत गव्हाळे रा. बालाजीनगर भोसरी पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने हे करत आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…
मुंबई : राज्यातील जमिनीच्या आणि मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि मालकी हक्क अधिक बळकट करण्यासाठी…
रात्रीचं जागरण, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता…