crime
पुणे : बकोरी रोड वाघोली येथे एका 21 वर्षीय युवकावर कोयत्याने वार करण्यात आल्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, ससून रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. ही हत्या समलैंगिक संबंधातून झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.
मृत्युमुखी पडलेला युवक हा बीजीएस कॉलेज वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. तो वाढेबोल्हाई येथे एका होस्टेलमध्ये राहत होता. त्याने त्याला रूग्णालयात घेऊन जाणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीस आपल्याला मारणाऱ्या आरोपीचे नाव आणि सदरचा प्रकार सांगितला आहे. प्रेमप्रकरणातून हा हल्ला झाल्याचे त्याने सांगत असतानाच तो बेशुद्ध झाला होता.
तपासादरम्यान समोर आलेल्या बाबीनुसार सदरची हत्या ही समलैंगिक संबंधातून झाल्याचा दाट संशय आहे. परंतु, नेमक्या कारणाचा पोलीस अजूनही शोध घेत आहेत. आरोपीच्या शोधार्थ दोन पथकं रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपी ताब्यात येण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात येत आहे.
मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. 21 वर्षीय तरुण महाविद्यालयातून घरी निघाला होता. यावेळी ओळखीतीलच एकाने त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याला जखमी केले. जखमी युवकाला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रक्तस्त्रावमुळे त्याला ससून रुग्णालयात हलवण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. ससूनला घेऊन जात असताना वाटेतच जखमी युवकाचा मृत्यू झाला. पोलिस पुढील तपास करत आहेत.
वाघोलीतील लॉजवर प्रेमीयुगुलाची गळफास घेत आत्महत्या…
वाघोलीत गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचताना युवकाचा मृत्यू…
वाघोलीत गर्भवती महिलेच्या पोटात मारली लाथ अन्…
वाघोलीत प्रेमप्रकरणातून प्रेयसीने केली प्रियकराची हत्या…
वाघोली येथे प्रेयसीने प्रियकराचा खून करत हाताची नस कापून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…