क्राईम

फेसबुकवरील मित्राच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा…

औरंगाबाद: विभक्त होऊन देखील पती सतत त्रास देत असल्याने पत्नीने पतीची निर्घुण हत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आली असून 12 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या पत्नीने मित्राच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची घटना घडली आहे.

पतीला मनसोक्त दारु पाजून त्याच्या पोटात चाकूने वार करीत पत्नीने त्याचा काटा काढला असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.विशेष म्हणजे आरोपी महिलेने पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी फेसबुकवर भेटलेल्या प्रियकराची मदत देखील घेतली होती. विजय संजयकुमार पाटणी (35, रा. एन-६, सिडको) असे मृताचे नाव असून, पत्नी सारिका विजय पाटणी (30, रा. सलामपुरेनगर, वडगाव कोल्हाटी) आणि तिचा प्रियकर सागर मधुकर सावळे (25 रा. शिवाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती त्रास देत असल्यामुळे संपविले…

सारिका व विजयचा १० एप्रिल २०१० रोजी प्रेमविवाह झाला होता. या दोघांना नऊ वर्षांची एक मुलगीही आहे. मात्र, काही वर्षांपासून दोघांमध्ये सतत खटके उडत होते. त्यामुळे दोघे एकत्र राहत नव्हते. सारिका बेपत्ता झाल्याची तक्रार विजय याने बेगमपुरा व एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंदविली होती. याच काळात सारिकाची मैत्री सागरसोबत झाली. तेव्हापासून ती आईकडेच राहत होती. काही दिवसांपासून विजय हा पत्नीकडे सतत दारू पिऊन येत त्रास देत होता. त्याच्या त्रासाला सारिका कंटाळली होती. तिने पतीला संपविण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी तिने १८ ऑक्टोबरच्या रात्री पती विजय यास वाल्मी परिसरातील सोलापूर-धुळे महामार्गालगत गोड बोलून नेले. त्यांच्या पाठोपाठ तिचा मित्र सागरही आला. पती-पत्नी बसलेले असतानाच सारिकाने पतीच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केला. सागरही मदतीला होताच. दोघांनी मिळून विजय यास संपविल्यानंतर मृतदेह झुडपात टाकून पोबारा केला. २२ ऑक्टोबरला पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून सारिका परभणी जिल्ह्यात नातेवाइकांकडे निघून गेली.

गुन्हे शाखेने कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून आरोपी पत्नीसह मित्राला शोधत खुनाचा उलगडा केला. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

14 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

18 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

18 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

18 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

18 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

21 तास ago