महाराष्ट्र

आता थकीत वीजबिलापोटी वीज कनेक्शन कट होणार नाही…

औरंगाबाद: आधीच आस्मानी-सुलतानी संकटांनी भांबावलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा आयोगाने शेतकऱ्यांसाठी मोठा निकाल दिला आहे. त्यानुसार, थकीत वीजबिलापोटी आता कोणत्याही शेतकऱ्याची वीज आता महावितरणला कापता येणार नाही. आयोगाने महावितरणला तसा सूचना वजा आदेशच दिला आहे.

थकीत वीजबिलाच्या मुद्द्यावरुन अनेकदा महावितरणकडून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात होता. त्याविरोधात लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने सचिन धांडे यांनी महावितरणविरोधात (MSEB) अन्नसुरक्षा आयोगात याचिका दाखल केली होती. त्यावर आयोगाने नुकताच निकाल दिला.

गेल्या काही दिवसांत अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यात कृषिपंपाची वीज कापली गेल्यास शेतकऱ्यांना रब्बी पिकेही घेणं मुश्किल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिके उभी असताना, कुठल्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापू नये, असा आदेशच अन्न सुरक्षा आयोगाने महावितरणला दिला आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.

शेतकऱ्याने शेतात अन्नधान्य पिकवलं नाही तर आपण काय खाणार? त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी योग्य पाणीपुरवठा आणि वीज पुरवठा व्हायला हवा. अर्थात तो त्यांचा अधिकारच आहे. असा दृष्टिकोन ठेवत राज्य अन्नसुरक्षा आयोगाने महत्वपूर्ण निकाल दिल्याने महावितरणाला आता शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कापता येणार नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

5 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

13 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago