महाराष्ट्र

आता थकीत वीजबिलापोटी वीज कनेक्शन कट होणार नाही…

औरंगाबाद: आधीच आस्मानी-सुलतानी संकटांनी भांबावलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा आयोगाने शेतकऱ्यांसाठी मोठा निकाल दिला आहे. त्यानुसार, थकीत वीजबिलापोटी आता कोणत्याही शेतकऱ्याची वीज आता महावितरणला कापता येणार नाही. आयोगाने महावितरणला तसा सूचना वजा आदेशच दिला आहे.

थकीत वीजबिलाच्या मुद्द्यावरुन अनेकदा महावितरणकडून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात होता. त्याविरोधात लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने सचिन धांडे यांनी महावितरणविरोधात (MSEB) अन्नसुरक्षा आयोगात याचिका दाखल केली होती. त्यावर आयोगाने नुकताच निकाल दिला.

गेल्या काही दिवसांत अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यात कृषिपंपाची वीज कापली गेल्यास शेतकऱ्यांना रब्बी पिकेही घेणं मुश्किल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिके उभी असताना, कुठल्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापू नये, असा आदेशच अन्न सुरक्षा आयोगाने महावितरणला दिला आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.

शेतकऱ्याने शेतात अन्नधान्य पिकवलं नाही तर आपण काय खाणार? त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी योग्य पाणीपुरवठा आणि वीज पुरवठा व्हायला हवा. अर्थात तो त्यांचा अधिकारच आहे. असा दृष्टिकोन ठेवत राज्य अन्नसुरक्षा आयोगाने महत्वपूर्ण निकाल दिल्याने महावितरणाला आता शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कापता येणार नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात महसूलचे अधिकारी कर्मचारी आरक्षण सोडतीत व्यस्त; अन मुरुम माफिया नैसर्गिक संपत्तीच्या लुटीत मस्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया…

4 तास ago

रांजणगाव MIDC मधील औषध कंपनीला २५ लाखांच्या खंडणीची मागणी; वकिलाविरोधात गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी…

4 तास ago

कुर्ला विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…

9 तास ago

राष्ट्रवादीतील संघर्षाचा फुगा आणि घराणेशाहीची वास्तवकथा

मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…

9 तास ago

विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची ‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ सुरू

मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…

9 तास ago

पुणे विषारी दारू प्रकरणाच्या तपासाला वेग; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनांनुसार सीआयडीची व्यापक कारवाई

पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…

10 तास ago