मनोरंजन

‘देवमाणूस’मधून एक्झिट घेतल्यानंतर कोणती अभिनेत्री रुबाब चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मुंबई: लोकप्रिय झी मराठी मालिकेतल्या ‘देवमाणूस’ मालिकेतील आर्या पात्र साकारलेल्या अभिनेत्री सिमरन खेडकरने नुकतीच केएमडब्ल्यू चॅनेलला मुलाखत दिली. मालिकेत आर्याचा खून झाला असून, हा खून लालीच्या हस्ते घडल्याचे प्रेक्षकांनी पाहिले आहे.

सिमरनने मुलाखतीत आर्या पात्राबद्दल सांगितले, “मला आर्या या पात्राचं कौतुक यासाठी वाटतं की, प्रेम करण्याची आणि आपली स्वप्नं पूर्ण करण्याची अफाट ताकद तिच्यात आहे. प्रचंड मेहनती असं ते पात्र होतं आणि माझ्या खऱ्या आयुष्यात मीदेखील तशीच आहे. मेहनतीला मी घाबरत नाही, तसंच आर्याचंदेखील होतं. मला ही गोष्ट नव्यानं शिकण्यास मिळाली.”

मालिकेतील सहकलाकारांबद्दलही सिमरनने मनोगत दिले. किरण गायकवाडाबद्दल तिने म्हटले की तो “उत्तम सहकलाकार आहे”. मिलिंद शिंदे “सर्वोत्तम कलाकार” आहेत, तर माधव अभ्यंकर “बापमाणूस आहेत”. नरूआजीची भूमिका करणाऱ्या रुक्मिणी सुतारबाबत तिने “आमची हिरोईन” अशी ओळख दिली. सोनम म्हसवेकरसाठी तिने सीनियर म्हणून कौतुक केले.

सिमरनने आगामी प्रोजेक्टबाबत देखील माहिती दिली. ती म्हणाली, “मी झी मराठीच्या मालिकेत काम केलं आणि आता माझा झी स्टुडिओतर्फे चित्रपट येतोय. ‘रुबाब’ असं सिनेमाचं नाव आहे. ६ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.”

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, आर्या ही इन्स्पेक्टर जामकरची बहीण होती. गोपाळला तिचा मृतदेह सापडला आहे, मात्र इतर कोणालाही तिच्या खुनाबद्दल माहिती नाही. इन्स्पेक्टर जामकर आपल्या बहिणीच्या शोधात आहे, पण त्याला काहीही सापडत नाही. मालिकेत अनेक ट्विस्ट येत असल्यामुळे प्रेक्षक उत्सुकतेने पुढील भाग पाहत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

11 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

11 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago