मनोरंजन

‘कमळी’तील अन्नपूर्णा आजींचा प्रवास: टीकेपासून आत्मविश्वासापर्यंत!

मुंबई: कमळी ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेने ठरलं तर मग ला तगडी स्पर्धा देत टीआरपीच्या शर्यतीत दमदार कामगिरी केली आहे. मालिकेतील कमळीप्रमाणेच घराची कर्ती, जबाबदार आणि कणखर अन्नपूर्णा आजींची भूमिका देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.

अन्नपूर्णा आजींची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री ईला भाटे यांनी साकारली आहे. मालिकेत त्या आपल्या हरवलेल्या नातीच्या शोधात असल्याचं दाखवलं आहे. मात्र, आज ज्या भूमिकेसाठी त्यांचं कौतुक होतंय, त्याच ईला भाटे यांना कारकिर्दीच्या सुरुवातीला कडव्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा अनुभव सांगितला. १९८९ साली त्यांनी ‘दुसरा सामना’ हे नाटक केलं होतं. हे नाटक कलावैभव या संस्थेचं होतं. प्रसिद्ध नाटककार सतीश आळेकर यांनी लेखन केलं होतं, तर दिग्दर्शन वामन केंद्रे यांनी केलं होतं. या नाटकात विक्रम गोखले आणि विनय आपटे प्रमुख भूमिकेत होते. त्या दोघांची मैत्रीण अशी ईला यांची भूमिका होती.

भूमिका लहान असली तरी महत्त्वाची होती. सुरुवातीला त्यांच्या मेहनतीचं आणि व्यक्तिमत्त्वाचं कौतुक झालं. पण त्याच वेळी त्यांच्या आवाजावर कठोर टीका झाली. “आवाज अनुनासिक आहे, सुखद नाही,” अशी टीका ऐकून त्या खचल्या होत्या. कारण त्यांना तेव्हाच जाणवलं होतं की त्यांना अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं आहे.

मात्र त्यांनी हार मानली नाही. स्वतःतील उणीव स्वीकारत त्यांनी त्यावर काम करण्याचा निर्णय घेतला. आवाज सुधारण्यासाठी काय करता येईल याबाबत विचारपूस केल्यानंतर त्यांना संगीततज्ज्ञ डॉ. अशोक रानडे यांचं नाव सुचवण्यात आलं.

विक्रम गोखले त्यांना डॉ. रानडे यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी तब्बल ३० सत्रांमध्ये ईला भाटे यांना आवाज जोपासना शास्त्र शिकवलं. या प्रशिक्षणामुळे फक्त त्यांचा आवाजच बदलला नाही, तर अभिनयाकडे पाहण्याची सखोल दृष्टीही मिळाली. आजही त्या त्यांच्या मार्गदर्शनाचा सराव करतात.टीकेला संधीमध्ये बदलत, स्वतःवर काम करत यश संपादन करणाऱ्या ईला भाटे यांचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

4 मिनिटे ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

9 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

9 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

9 तास ago

खड्ड्यांनी वेढला पाबळ–कन्हेरसर रस्ता; जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास

पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी पाबळ (सुनिल जिते): पाबळ–कन्हेरसर हा…

9 तास ago

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड…

10 तास ago