मनोरंजन

स्टार प्रवाह वर १६ फेब्रुवारीपासून मोठे बदल; ‘ठरलं तर मग’ आता पाऊण तास

मुंबई: मराठी छोट्या पडद्यावरील आघाडीची वाहिनी स्टार प्रवाह येत्या १६ फेब्रुवारीपासून आपल्या कार्यक्रमांच्या वेळापत्रकात मोठे बदल करत आहे. गेली तीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘ठरलं तर मग’ मालिका आता अधिक वेळ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तिच्या प्रसारणाच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

‘ठरलं तर मग’ आता प्राइम स्लॉटमध्ये

टीआरपीच्या शर्यतीत कायम आघाडीवर असलेली ‘ठरलं तर मग’ मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ८:४५ ते ९:३० या वेळेत प्रसारित केली जाणार आहे. म्हणजेच ही मालिका आता पाऊण तास चालेल. तर शनिवार-रविवारी मालिकेची वेळ नेहमीप्रमाणे रात्री ८:३० ते ९ अशीच असेल.

‘नशीबवान’ दुपारच्या स्लॉटमध्ये

आदिनाथ कोठारे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘नशीबवान’ मालिका आतापर्यंत रात्री ९ वाजताच्या प्राइम स्लॉटला प्रसारित होत होती. मात्र १६ फेब्रुवारीपासून ही मालिका दुपारी २:३० वाजता दाखवली जाणार आहे. त्यामुळे रात्री ९ च्या स्लॉटमध्ये ‘ठरलं तर मग’ची एन्ट्री होणार आहे.

‘तू ही रे माझा मितवा’ची नवीन वेळ

‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ८:०० ते ८:४५ या वेळेत प्रसारित होईल. तर शनिवार-रविवारी ही मालिका रात्री ८:०० ते ८:३० या वेळेत ऑन एअर होणार आहे.

महिन्याभरात ‘तुझ्या सोबतीने’ची वेळ बदलली

जानेवारीतच सुरू झालेली ‘तुझ्या सोबतीने’ ही मालिका आधी रात्री १० वाजता प्रसारित होत होती. मात्र १६ फेब्रुवारीपासून ही मालिका रात्री ९:३० वाजता दाखवली जाईल.त्यामुळे रात्री १० वाजताच्या स्लॉटला ‘वचन दिले तू मला’ ही मालिका शिफ्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

१६ फेब्रुवारीपासूनचे नवे वेळापत्रक

तू ही रे माझा मितवा – ८:०० ते ८:४५ (सोम-शुक्र) | ८:०० ते ८:३० (शनि-रवि)

ठरलं तर मग – ८:४५ ते ९:३० (सोम-शुक्र) | ८:३० ते ९:०० (शनि-रवि)

नशीबवान – दुपारी २:३०

तुझ्या सोबतीने – रात्री ९:३०

वचन दिले तू मला – रात्री १० (शक्यता)

दरम्यान, जवळपास पाच मालिकांच्या वेळेत बदल केल्याने टीआरपीच्या गणितावर काय परिणाम होणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. तसेच रात्री ९ वाजताच्या स्लॉटमध्ये भविष्यात कोणती नवीन मालिका दाखल होणार, याकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

11 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

11 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

11 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

13 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

1 दिवस ago