मुंबई: मराठी मनोरंजनविश्वात सध्या बिग बॉस मराठीची जोरदार चर्चा रंगली आहे. घरातील टास्क, वाद-विवाद आणि स्पर्धकांमधील संघर्षामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या ‘भाऊच्या धक्क्या’मध्ये सूत्रसंचालक रितेश देशमुख स्पर्धकांची कानउघडणी करताना दिसतात. मात्र यावेळचा ‘भाऊचा धक्का’ अधिकच गाजताना दिसत आहे.
रुचिताच्या हावभावावरून वाद
पाचव्या ‘भाऊच्या धक्क्या’च्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख संतापलेले दिसत आहेत. त्यांच्या निशाण्यावर स्पर्धक रुचिता जामदार होती. एका भागात रुचिताने अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यासमोर ‘आ थू’ असा अवमानकारक हावभाव केल्याचा मुद्दा रितेश यांनी उपस्थित केला. या वर्तनावरून त्यांनी रुचिताला चांगलंच सुनावलं.
“मी बोलतो आहे ना…”
प्रोमोमध्ये रितेश बोलत असताना रुचिता मध्येच बोलण्याचा प्रयत्न करताना दिसते. त्यावर रितेश संतप्त होत म्हणतात, “मी बोलतो आहे ना…” तसेच त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, “तुम्ही जे केलं आहे, हे खरंतर महाराष्ट्रातील कोणत्याच आईला बिलकूल आवडलेलं नाही.”
रुचिता तोंड वाकडं करत असल्याचं पाहून रितेश आणखी भडकतात आणि इशारा देतात, “हे असले हावभाव द्यायचे असतील तर तुम्ही आत जा. इथे तुम्हाला जागा नाही.” या वक्तव्यानंतर घरातील वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे.
प्रोमो व्हायरल, नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा संतापजनक क्षण असलेला प्रोमो कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून तो वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी रितेश यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे, तर काहींनी रुचितालाही तिची बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.
पुढील भागाकडे लक्ष
आता येत्या ‘भाऊच्या धक्क्या’मध्ये नेमकं काय घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रुचितावर काही कारवाई होणार का? की हा वाद इथंच थांबणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…
शिक्रापुर (ओंकार भोरडे) शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36…
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…
मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…