मनोरंजन

फुलाला सुगंध मातीचा मालिका पुन्हा पाहायला मिळणार

मुंबई: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका फुलाला सुगंध मातीचा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेला आणि मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिल.

मालिका जरी गोड वळणावर थांबत असली तरी लोकाग्रहास्तव या मालिकेचं पुन:प्रसारण करण्यात येणार आहे. ५ डिसेंबरपासून सायंकाळी ६ वाजता फुलाला सुगंध मातीचा मालिका पहिल्या भागापासून प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येणार आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. जीजी अक्का ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री अदिती देशपांडे यांनी मालिकेचं पुन:प्रसारण होतोय याविषयी आनंद व्यक्त केला आहे.

‘माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं होतंय की एखादी मालिका संपल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रेमापोटी लगेच त्या मालिकेचे भाग पहिल्यापासून दाखवले जाणार आहेत. माझ्याकडे आनंद व्यक्त करायला शब्दच नाहीत. जीजी अक्कासारख्या विचारांच्या बायका आजही समाजात आहेत. ज्यांच्यासाठी घर, संसार आणि कुटुंब हेच त्यांचं आयुष्य आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पात्र कुठेही नकारात्मक झालं नाही.

शुभम ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता हर्षद अतकरी म्हणला, ‘फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील शुभम साकारणं अभिनेता म्हणून खुपच कठीण होतं. कठीण यासाठी म्हणतोय कारण सध्याच्या काळात शुभम सारख्या मनाने चांगल्या असणाऱ्या व्यक्ती फारच क्वचित सापडतील. या मालिकेने शुभमचा चांगुलपणा, शांतपणा, सर्वांना सांभाळून घेण्याची वृत्ती अश्या खूप गोष्टी दिल्या. हे पात्र नेहमीच मनाच्या जवळ राहिल. ५ डिसेंबरपासून पुन्हा प्रेक्षकांना शुभम-कीर्तीचा प्रवास रिपिट टेलिकास्टच्या रुपात अनुभवायला मिळेल याचा आनंद आहे.’

तर कीर्ती हे पात्र साकारणारी अभिनेत्री समृद्धी केळकर म्हणाली, ‘फुलाला सुगंध मातीचा ही मालिका आणि त्यातलं मी साकारलेलं कीर्ती हे पात्र माझ्यासाठी ड्रीमरोल होता. या पात्राच्या निमित्ताने प्रेम, भांडण, पोलीस खात्यातलं कर्तव्य, कर्तव्य बजावताना करावे लागलेले स्टण्ट्स हे सगळं करण्याची संधी मिळाली. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की हे पात्र साकारायला मिळालं. मात्र ज्याची सुरुवात होते त्याचा शेवटही ठरलेला असतो. या मालिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आनंदआश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…

46 मिनिटे ago

अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…

48 मिनिटे ago

धुराची आग लावणाऱ्यांनाच आता धुराची अॅलर्जी!

मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…

52 मिनिटे ago

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

16 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

19 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

2 दिवस ago