मनोरंजन

फुलाला सुगंध मातीचा मालिका पुन्हा पाहायला मिळणार

मुंबई: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका फुलाला सुगंध मातीचा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेला आणि मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिल.

मालिका जरी गोड वळणावर थांबत असली तरी लोकाग्रहास्तव या मालिकेचं पुन:प्रसारण करण्यात येणार आहे. ५ डिसेंबरपासून सायंकाळी ६ वाजता फुलाला सुगंध मातीचा मालिका पहिल्या भागापासून प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येणार आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. जीजी अक्का ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री अदिती देशपांडे यांनी मालिकेचं पुन:प्रसारण होतोय याविषयी आनंद व्यक्त केला आहे.

‘माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं होतंय की एखादी मालिका संपल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रेमापोटी लगेच त्या मालिकेचे भाग पहिल्यापासून दाखवले जाणार आहेत. माझ्याकडे आनंद व्यक्त करायला शब्दच नाहीत. जीजी अक्कासारख्या विचारांच्या बायका आजही समाजात आहेत. ज्यांच्यासाठी घर, संसार आणि कुटुंब हेच त्यांचं आयुष्य आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पात्र कुठेही नकारात्मक झालं नाही.

शुभम ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता हर्षद अतकरी म्हणला, ‘फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील शुभम साकारणं अभिनेता म्हणून खुपच कठीण होतं. कठीण यासाठी म्हणतोय कारण सध्याच्या काळात शुभम सारख्या मनाने चांगल्या असणाऱ्या व्यक्ती फारच क्वचित सापडतील. या मालिकेने शुभमचा चांगुलपणा, शांतपणा, सर्वांना सांभाळून घेण्याची वृत्ती अश्या खूप गोष्टी दिल्या. हे पात्र नेहमीच मनाच्या जवळ राहिल. ५ डिसेंबरपासून पुन्हा प्रेक्षकांना शुभम-कीर्तीचा प्रवास रिपिट टेलिकास्टच्या रुपात अनुभवायला मिळेल याचा आनंद आहे.’

तर कीर्ती हे पात्र साकारणारी अभिनेत्री समृद्धी केळकर म्हणाली, ‘फुलाला सुगंध मातीचा ही मालिका आणि त्यातलं मी साकारलेलं कीर्ती हे पात्र माझ्यासाठी ड्रीमरोल होता. या पात्राच्या निमित्ताने प्रेम, भांडण, पोलीस खात्यातलं कर्तव्य, कर्तव्य बजावताना करावे लागलेले स्टण्ट्स हे सगळं करण्याची संधी मिळाली. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की हे पात्र साकारायला मिळालं. मात्र ज्याची सुरुवात होते त्याचा शेवटही ठरलेला असतो. या मालिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…

14 मिनिटे ago

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

46 मिनिटे ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

2 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

3 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

3 तास ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

4 तास ago