शिंदोडी (तेजस फडके): शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील लाखो हेक्टर शेतीला वरदान ठरलेल्या चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे सध्या धरणातुन नदीपात्रात एकुण २० हजार क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येत असल्याची माहिती घोड पाटबंधारे विभागाचे उप अभियंता महेश शिंदे यांनी दिली. तसेच नागरिकांनी अनावश्यकपणे नदीकाठी न जाण्याचे आवाहनही प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.
आज दि २० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता घोड धरण प्रशासनाने सांडव्यावरुन सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात ७ हजार क्युसेक्सने वाढ केली असुन या वाढीव विसर्गामुळे सध्या धरणातुन नदीपात्रात एकुण २० हजार क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे घोड नदीच्या पात्रातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…
मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…
सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…
हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…
कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…
1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…