शिंदोडी (तेजस फडके): शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील लाखो हेक्टर शेतीला वरदान ठरलेल्या चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे सध्या धरणातुन नदीपात्रात एकुण २० हजार क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येत असल्याची माहिती घोड पाटबंधारे विभागाचे उप अभियंता महेश शिंदे यांनी दिली. तसेच नागरिकांनी अनावश्यकपणे नदीकाठी न जाण्याचे आवाहनही प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.
आज दि २० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता घोड धरण प्रशासनाने सांडव्यावरुन सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात ७ हजार क्युसेक्सने वाढ केली असुन या वाढीव विसर्गामुळे सध्या धरणातुन नदीपात्रात एकुण २० हजार क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे घोड नदीच्या पात्रातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…
मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…
मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…
मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…
महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…