मुख्य बातम्या

शिरुर शहरात पोलिसाचीच चारचाकी गाडी चोरीला, पोलिसांच्या गाड्या सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील बाबुरावनगर येथून पोलीस कर्मचारी योगेश आनंदा गुंड यांची मारुती सुझुकी कंपनीची ईरटीका हि चारचाकी गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे. त्यामुळे जर पोलिसांच्याच गाड्या सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय…? असा सवाल आता शिरुर शहरातील नागरीक उपस्थित करत आहेत.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि २५) ऑगस्ट रोजी पहाटे ३:५८ च्या सुमारास शिरुर शहरातील बाबुरावनगर हद्दीत महेंद्र हाईट्स या बिल्डींगच्या बाजुला रोडच्या कडेला लॉक करुन पार्क केलेली योगेश गुंड यांची मारुती सुझुकी कंपनीची इर्टिगा कार नं. एम एच १२ टिडी ०७०२ (MH12TD 0702) ही चारचाकी गाडी स्विप्ट डिझायर कार मधुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी गाडीचे लॉक तोडुन चोरी करुन घेवुन गेले आहेत. या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार जगताप हे करत आहे.

 

शिरुर पोलिसांना चोरांचे आव्हान…?

शिरुर शहरातुन आता पोलिसाची गाडी चोरीला गेल्यामुळे या चोऱ्या रोखणे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शिरुर पोलीस स्टेशनची हद्द खूप मोठी असुन टाकळी हाजी येथे स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे ही बऱ्याच दिवसाची मागणी सरकारकडे प्रलंबित आहे. राजकीय नेत्यांनी ही गरज ओळखून या ठिकाणी स्वतंत्र पोलीस स्टेशन होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिरुर पोलिस स्टेशनमध्ये अपुरा कर्मचारी स्टाफ असल्याने यामुळे पोलीस बांधवांवर काम करताना प्रंचड ताण येत आहे. यामुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून शहरासह ग्रामीण भागात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे.

शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार, जांबुत येथील चौथी घटना, वनविभागाचा गलथान कारभार समोर

रांजणगाव MIDC तील MEPL कंपनी १० ते १५ दिवस बंद ठेवण्याचे MIDC चे प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर यांचे आदेश

शिरुर पोलिसांची दहा इलेव्हन कॅफे वर धडक कारवाई, मुला-मुलींचे अश्लील वर्तन; कॅफे चालकावर गुन्हा दाखल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

2 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

2 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

2 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

2 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

2 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

2 तास ago