मुख्य बातम्या

जांबुत येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांसह नातेवाईकांचा नकार

शिरुर (अरुणकुमार मोटे) जांबुत (ता. शिरुर) येथे सोमवारी (दि २६) रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मुक्ताबाई भाऊ खाडे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत जांबुत ग्रामस्थांनी आक्रमकतेचा पवित्रा घेत वनविभागाच्या विरोधात संताप व्यक्त केला असुन नातेवाईक व कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास थेट नकार दिला असल्याची माहिती समोर येत आहे.

गेली दोन वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्यावर हल्ले होऊन मृत्यू होण्याची ही चौथी घटना असुन वनविभागाकडून कोणत्याही ठोस उपाय योजना करण्यात येत नसून वाढत्या बिबट संख्येला आळा घालण्यास शिरुर वनविभाग अपयशी ठरला असल्याचे दिसुन येते. या घटनेचा निषेध करण्यासाठी जांबुत ग्रामस्थांनी बस स्थानकावर बैठक घेऊन प्रशासनाचे विरोधात आज मंगळवार (दि २८) रोजी दुपारी रास्ता रोको करुन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन दुपारी हे आंदोलन होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

 

शिरुरच्या बेट भागातील एकाच गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात बिबट्याची संख्या वाढलेली आहे. मोठ्या प्रमाणात मनुष्यावर हल्ले झालेले आहेत. या हल्ल्यात चार जणांना आपला निष्पाप जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक प्रमाणात पशुधन धोक्यात आलेले असताना देखील ठोस उपाययोजना करण्याऐवजी वनविभाग प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे काय…? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी घटनास्थळी उपस्थित केला आहे.

 

वनविभाग पिंजरे लावण्यासाठी अथवा बिबट समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी जर सर्वसामान्यांना शिरुर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कायदा दाखवत असतील तर अजूनही वनविभाग किती बळी जाण्याची वाट बघत आहे अशी खेदजनक भावना ग्रामपंचायत सदस्य राहुल जगताप यांनी व्यक्त केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी जगताप यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात असून वनविभागाविरोधात जांबुत परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत.

शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार, जांबुत येथील चौथी घटना, वनविभागाचा गलथान कारभार समोर

शिरुर शहरात पोलिसाचीच चारचाकी गाडी चोरीला, पोलिसांच्या गाड्या सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आनंदआश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…

25 मिनिटे ago

अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…

27 मिनिटे ago

धुराची आग लावणाऱ्यांनाच आता धुराची अॅलर्जी!

मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…

31 मिनिटे ago

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

16 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

18 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

2 दिवस ago