मुख्य बातम्या

पोलिस आणि पत्रकारांचे विशेष मुलांसोबत अनोखे रक्षाबंधन

शिरुर (किरण पिंगळे): शिरुर तालुक्यातील पोलिस आणि पत्रकार यांनी विशेष मुलांच्या संस्थेत जाऊन त्यांच्या मुलांच्या हस्ते राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

शिरुर येथील आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन ही विशेष मुलांची संस्था गेल्या 7 वर्षांपासून कार्यरत आहे.या वर्षी पोलिस व पत्रकार यांचा रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी संस्थेच्या संस्थापिका राणीताई चोरे यांनी उपस्थितांचे स्वागत करत प्रास्ताविक केले. गेले 2 वर्षे कोरोना संकटामुळे सर्वच शाळा बंद होत्या. या संकटात विशेष मुलांचे मोठे हाल झाले. त्यानंतर सध्या शाळा सुरु झाल्याने संस्था चालविण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर उपस्थित पत्रकार मित्रांनी व पोलिस अधिकाऱ्यांनी देखील प्रत्येक अडचणीत ठाम मदत करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांना दिली.

पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी बोलताना सांगितले की, विशेष मुलांचा सांभाळ करणे हे आव्हान असते. कोरोना नंतर परिस्थिती बदलली आहे. पुढील काळात जी शक्य असेल ती मदत केली जाणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. यावेळी पत्रकार अभिजीत आंबेकर, तेजस फडके, रवींद्र खुडे, किरण पिंगळे, सतीश केदारी, शैलेश जाधव, महिला पोलिस नाईक रेखा टोपे, पोलिस नाईक प्रताप टेंगले, मीना गवारे यांसह विशेष शिक्षिका अर्चना पाचर्णे, कीर्ती वाखारे, स्टाफ व मुले आवर्जून उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

2 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

2 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

2 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

2 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

3 तास ago

बारावी निकाल 89.79% : यशस्वी विद्यार्थ्यांचे दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन

आवडीनुसार पुढील वाटचालीचे आवाहन; मुलींची उत्तीर्णता मुलांपेक्षा 6.35% अधिक मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12…

3 तास ago